Breaking

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी १७ नोव्हेंबर २०२० ची मतदार यादी ग्राह्य धरण्याची सतीश नीळ यांची निवडणूक आयोगाकडे मागणी*




*ग्रामपंचायत निवडणूकीसाठी १७ नोव्हेंबर २०२० ची मतदार यादी ग्राह्य धरण्याची सतीश नीळ यांची निवडणूक आयोगाकडे मागणी*



*करमाळा तालुका प्रतिनिधी-अतुल वारे पाटील*
    ग्रामपंचायत निवडणूक कामी 17 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध झालेली मतदार यादी ग्राह्य धरण्याची मागणी करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष  तथा सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक सतीश नीळ पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
     निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की , २०/११/२०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या आदेशा प्रमाणे  २५/९/२०२० रोजी पर्यंत ज्या मतदारांची नोंदणी झाली आहे. अशाच  मतदारांचा यादीत समावेश करण्यात येईल व  त्यांनाच होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदार म्हणून व निवडणूक लढविण्यात येईल असे नमूद केले आहे. परंतु १७/११/२०२० रोजी पर्यंत नोंदणी झाली आहे ती मतदार यादी ग्राह्य धरण्यात यावी अन्यथा  सदरील नवीन नोंदणी केली आहे अशा मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यांच्या वर अन्याय होणार आहे. त्यांचा न्यायिक हक्क मिळाला पाहिजे.
 तसेच विधानसभा मतदार यादीत   नोंदणी झाली आहे त्यांचाच ग्रामपंचायत निवडणुकीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या एक वर्षापासून नवीन नोंदणी झालेल्या मतदारांना त्यांच्या हक्का पासून डावलले जात आहे.
त्यामुळे १७/११/२०२० रोजी पर्यंत ज्या मतदारांची नोंदणी केली आहे तीच मतदार यादी येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी सतीश नीळ पाटील यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा