आज बार्शी-कुर्डूवाडी मार्गावर रिधोरे येथे स्वाभिमानी पक्षाच्या वतीने रास्ता रोको
माढा तालुकाध्यक्ष सत्यवान गायकवाड यांनी दिली माहिती
माढा / प्रतिनिधी- राजेंद्र गुंड
- केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी मंजूर केलेल्या 3 शेतकरी विरोधी विधेयकाला तीव्र विरोध करण्यासाठी आणि ती विधेयके त्वरित माघारी घेऊन त्यात आवश्यक ती दुरुस्ती करुन नव्याने पारीत करावीत यांसह इतर अनेक मागण्यांसाठी आज गुरुवारी 5 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक 10 वाजता बार्शी-कूर्डूवाडी राज्य मार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने रास्ता रोको करण्यात येणार असून याबाबतचे निवेदन माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांना दिल्याची माहिती संघटनेचे तालुकाध्यक्ष सत्यवान गायकवाड यांनी दिली आहे.
पुढे अधिक माहिती देताना श्री गायकवाड म्हणाले की, यावर्षीचा सोलापूर जिल्ह्यातील विविध सहकारी व खासगी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाला असून चालू हंगामात एकरकमी एफ.आर.पी.द्यावी तसेच अद्यापपर्यंत एकाही साखर कारखान्याने अंतिम दर जाहीर केला नाही त्यामुळे अंतिम दर जाहीर करुनच ऊस तोडणी करावी आणि शेतकऱ्यांना ऊसाचे पेमेंट नियमित वेळेवर द्यावे अशा आमच्या संघटनेच्या आग्रही मागण्या आहेत.तरी या रास्ता रोको आंदोलनासाठी सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना व पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच शेतकऱ्यांना कोरोनाच्या संदर्भातील शासनाच्या आदेशांचे पालन करून उपस्थित रहावे असे आवाहन स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा