Breaking

बुधवार, ४ नोव्हेंबर, २०२०

व्यक्तिस्वांतत्र्यावर घाला घालनार्‍या तिघाडी सरकारचा जाहीर निषेध*




*व्यक्तिस्वांतत्र्यावर घाला घालनार्‍या तिघाडी सरकारचा जाहीर निषेध*

तुळजापूर प्रतिनिधी संदीप डोलारे


भारतातील नामवंत पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकावता येणार नाही म्हणून एका वास्तुविशारद आत्महत्या प्रकरणी जी केस 2018 सालीच बंद झाली होती ती केवळ आणि केवळ सुडाच्या भावनेने पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली. 
भारतातील नामांकित पत्रकार गोस्वामी यांना केलेली अटक ही व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असून सूड भावनेतून केलेली कृति आहे. आम्ही या कृतीचा जाहीर निषेध करतो. जे प्रकरण सन 2018 साली बंद करण्यात आले होते ते केवळ व्यतिगत द्वेशापोटी उकरून काढून त्यांना अटक करण्यात आल्याचे दिसून येते.
या प्रकरणाने देशातील जनतेला पुन्हा एकदा इंदिराजीनी लागू केलेल्या आणीबाणीची आठवण करून दिली आहे. या प्रकरणामुळे जनतेमध्ये प्रचंड रोषं निर्माण झाला असून जनता सरकारच्या पुढे झुकणार नाही.
त्यामुळे अर्णब गोस्वामी यांच्या झालेल्या अटकेचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस अॅड. नितिन भोसले, प्रदीप शिंदे, भारतीय जनता युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्री, राजसिंहा राजेनिंबाळकर, जिल्हाउपाध्याक्षं इंद्रजीत देवकते, शहराध्यक्ष राहुल काकडे, तालुकाध्यक्ष गजाजन नलावडे, अॅड. कुलदीप भासले, सुजीत साळुंके, हिम्मत भोसले, ओम नाईकवाडी, शंकर मोरे, निरंजन जग्दाळे, दादुस गुंड, अनिकेत कोळगे, राहुल शिंदे, इत्यादी युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा