*ऐन सणासुदीच्या काळात गावोगावी* *दिव्यांचा* *लखलखाट !* तर ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रेडा गाव मात्र चक्क अंधारात !!*
*रेडा प्रतिनिधी ता. इंदापूर* शशिकांत सोनटक्के
दि 9.
रेडा ग्रामपंचायतीच्या गलथान कारभाराचा अजब नमुना गावातील ग्रामस्थांना सध्या अनुभवयास मिळत आहे .त्याचे कारणही तसेच आहे. रेडा ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त पदाधिकारी यांचा कार्यकाळ दिनांक २२ ऑगस्ट २०२० रोजी संपलेला असून रेडा गावात शासन नियमानुसार शासन नियुक्त असणारे प्रशासक श्री राजकुमार बामणे साहेब यांची नियुक्ती झाली.
नियुक्तीच्या दिनांकापासून आज तागायत त्यांची ओळख मात्र अद्याप पर्यंत अजून तरी रेडा गावास झालेली नाही. सदरचे गट शिक्षण अधिकारी प्रशासक पदी नियुक्त झालेले असले तरी ते प्रशासकाच्या भूमिकेत यायला तयार नाहीत.
त्यातच भर म्हणून की काय या रेडा गावास नूतन पदभार स्वीकारलेले ग्रामसेवक श्री गायकवाड हे शिरूर जिल्ह्यातील न्हावरा येथून ये-जा करतात.
त्यांच्या कामाची चौकशी झाल्यास, तसेच रेडा गावात कामावर येण्याचे चौकशी झाल्यास आठवड्यातून एखाद्या दुसऱ्या दिवशी येऊन एखाद्या तासभराची भेट देऊन गप्पा मारून निघून जातात. त्यामुळे रेडा गावात न प्रशासन, न ग्रामसेवक अशी अवस्था रेडा गावाची झालेली आहे.
त्यामुळे या गावात प्रशासक व ग्रामसेवक यांच्या मनमानी कामकाजाबाबत उलट-सुलट चर्चा ऐकावयास मिळत आहे.
कारण रेडा गावाच्या विकासात बाधा आणणारे गाव पुढारी नक्की कोण आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे.
कारण रेडा गावात शासनाने दिलेल्या 14 वा वित्त आयोग निधी व
माहे एप्रिल 2020 पासून सुरू असलेला 15 आयोगाचा निधीही खर्चा अभावी तसाच पडून आहे,
सदर निधीच्या खर्चाबाबत पंचवार्षिक विकास योजना आराखडा तयार असूनही प्रशासक व ग्रामसेवक यांच्या हलगर्जीपणामुळे व वेळ काढू पणामुळे रेडा गावच्या विकासाला मोठी खीळ बसलेली आहे ,
त्याचाच एक नमुना सांगायचा झाला तर ,रेडा गावातील मागील पंचवार्षिक सेवेत असणाऱ्या ग्रामसेवकांनी राबवलेल्या विविध योजना देखील गाव पुढाऱ्यांच्या श्रेय लाटण्याच्या नादातअपूर्ण आहेत. जसे की हायमास्ट दिवे उभे केले आहेत परंतु अद्याप पर्यंत चालू केलेले नाहीत. तसेच लाखो रुपये खर्च करून ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गावात बसवलेले सीसीटीव्ही योजनेचे कॅमेरे बंद अवस्थेत आहेत ,
याबाबत प्रशासनास वारंवार तोंडी, लेखी, तक्रार करूनही तसेच वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध करूनहीअद्याप पर्यंत त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, याचं कारण काय असू शकतं ॽ तसेच गावातील सार्वजनिक लाईट देखील बंद आहे.
यास सर्वस्वी प्रशासक व ग्रामसेवक हे दोघेही संयुक्तिक जबाबदार आहेत,
त्यांच्या नाकर्तेपणामुळे रेडा गावास विकासापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे आमचा गाव आमचा विकास ही योजना कागदावरच राहिली आहे .तरी इंदापूरचे गट विकास अधिकारी साहेब यांनी रेडा गावात लक्ष घालून संबंधित कर्मचाऱ्यांची तातडीने कानउघडणी करून त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देऊन रेडा गावास विकास गंगेच्या प्रवाहात आणावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा