*टेंभुर्णी येथील जनता विद्यालयाचे चेअरमन सह 12 जनावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल*
टेंभुर्णी प्रतिनिधी
:-टेंभुर्णी येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित जनता विद्यालयाचे २००८ पासुन कार्यरत असणारे सर्व चेअरमन, सचिव व मुख्याध्यापक यांनी गेली १२ वर्षापासुन शिपाई पदाची रिक्त असलेल्या जागेवर सागर भागवत राजगुरु यांना अनुकंपतत्वावरील नेमणुकीस जातिवाद करुन तसेच त्या जागेवर एका सवर्ण समाजच्या व्यक्तीची नेमणूक करुन जातीयवाद केले प्रकरणी जनता विद्यालयाचे विश्वस्थ व मुख्याध्यापक यांच्यावर नागरी हक्क संरक्षण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक मुंबई यांच्या आदेशान्वये टेंभुर्णी पोलिस ठाण्यात भा.द.वि. कलम३(२)(va) ३(१)(r)३(१) (U), ३(१)(q) व कलम ३४ प्रमाणे अनुसुचित जाती जमाती कायदे अंतर्गत अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
२००८ साली प्रयोगशाळा सहाय्यक पदावर रुजु असलेले भागवत भिमराव राजगुरु हे सेवेत असतानाच त्यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र सागर भागवत राजगुरु यांनी वडीलांच्या जागी अनुकंपतत्वावर प्रयोगशाळा सहाय्यक अथवा शिपाई पदी नेमणूकीसाठी शिक्षण प्रसारक मंडळ यांचेकडे रितसर अर्ज केला होता. परंतु २००८ ते २०२० पर्यंत शिक्षण प्रसारक मंडळ यांनी राजगुरु यांचे अनुकंपतत्वावरील नेमणुकीचा प्रस्ताव शिक्षण विभागाला पाठवला नाही.या उलट २०१३ साली सागर राजगुरु यांच्या जागी सवर्ण जातीच्या व्यक्तीची नेमणूक केली. या प्रकरणी शिक्षण अधिकारी (माध्य) सोलापुर, शिक्षण मंत्री, शिक्षण उपसंचालक, शिक्षण आयुक्त यांनी सागर भागवत राजगुरु यांची नेमणूक करण्याचे अनेक पत्र शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्थ व मुख्याध्यापक यांचेकडे पाठवले होते. परंतु मंडळाने सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश डावलुन सागर राजगुरु यांची नेमणूक करण्यास टाळाटाळ केली होती.
सागर भागवत राजगुरु यांनी एक वर्षापुर्वी टेंभुर्णी पोलिस ठाण्यामध्ये जनता विद्यालयाचे विश्वस्थ व मुख्याध्यापक यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार दिली होती.परंतु राजकीय दबावामुळे टेंभुर्णी पोलिस ठाणे यांनी राजगुरु यांची तक्रारिची दाखल घेतली नाही. त्यानंतर राजगुरु यांनी मागील वर्षी विषयांकित मागणीसाठी नागपुर येथे अधिवेशन काळात उपोषण देखील केले होते. व वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज देऊन पाठपुरावा केला होता.
सागर राजगुरु यांची तक्रार अर्जची दखल घेत नागरी हक्क संरक्षण पथकाचे महाराष्ट्र राज्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक मुंबई यांनी पोलिस अधीक्षक सोलापुर यांना जनता विद्यालयाचे २००८ पासुनचे सर्व विश्वस्थ व मुख्याध्यापक यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने त्यांचे आदेशान्वये जनता विद्यालयाचे विश्वस्थ पी. आर.सुतार, सुभाष मेथा, डी.व्ही. देशमुख, आर.ए. महामुनी, संतोष पाटिल, विलास राजमाने, जी. व्ही उबाळे, जवाहर मेथा,डि.के देशमुख, एच.एम तांबोळी, व मुख्याध्यापक प्रमोद भोसले यांच्यावर टेंभुर्णी पोलीस ठाणे मध्ये अट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा