*संस्कारक्षम समाजाच्या विचारांची गरज- गणेश करे पाटील*
*जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त मराठा सेवा संघाचे आरोग्य शिबीरात 50 महिलांची मोफत आरोग्य तपासणी*
करमाळा- राष्ट्रमाता जिजाऊ म्हणजे मातृत्वाचा अत्युच्च मानबिंदू असून संस्कारक्षम समाजाच्या उभारणीसाठी जिजाऊंचे विचार आचरणात आणणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांनी केले. मराठा सेवा संघ करमाळा तालुका आयोजित जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते .
यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंगरक्षक पथकातील सपोनि रोहित चौधरी माजी तालुकाध्यक्ष प्रा नागेश माने ,डॉ बिभीशण सारंगकर, तालुका कृषी अधिकारी देविदास सारंगकर ,संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, प्रसिद्ध वक्त्या रोहिणी वीर ,डॉ विनया सारंगकर, संभाजी ब्रिगेड माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सुर्वे, पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद जिल्हा कार्याध्यक्ष सतीश वीर ,तालुकाध्यक्ष अजित कणसे , सचिव संतोष शितोळे मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील, तालुका सचिव सचिन शिंदे, उपाध्यक्ष अजिनाथ घाडगे , संघटक सागर वारे माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख,विनोद शितोळे,संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष अमित घोगरे, सचिव गणेश डोके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र गोडगे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, नेते दीपक शिंदे,युवा तालुकाध्यक्ष अमोल घुमरे, तालुका उपाध्यक्ष तानाजी शिंदे,भैय्यासाहेब पाटील ,पत्रकार नानासाहेब घोलप, उत्तमराव वीर, पोपट पाटील, अंकुश सुरवसे, जिजाऊ इंग्लिश स्कूल च्या संचालिका सौ ज्योती वारे पाटील, सौ तृप्ती शिंदे,सौ रुपाली शितोळे, सौ सुनीता वीर,सौ राणी घोलप,सौ तेजस्विनी सुरवसे, आदी उपस्थित होते .
मराठा सेवा संघाच्या पुढाकाराने 50 महिलांची हिमोग्लोबिन व शुगर तपासणी करण्यात आली. करमाळा येथील कमलाई लॅबचे महेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर संपन्न झाले.
यावेळी पुढे बोलताना गणेश करे पाटील म्हणाले की जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थिती असतानासुद्धा धीरोदात्तपणे सामोरे जाऊन शिवरायांसारखा मुलगा व शंभूराजा सारखा नातू घडवून न्याय -नीती आणि संस्कारांनी परिपूर्ण असे दोन छत्रपती घडवून जगासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला . मराठा सेवा संघ करत असलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी कौतुक करत सेवा संघामुळे सामाजिक समतोल राखला जात असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. महापुरुषांच्या प्रती समाजाची असलेली उदासीनता समाजाला घातक ठरण्याची भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी बोलताना प्रसिद्ध वक्त्या रोहिणी वीर यांनी स्त्रियांना समानतेची वागणूक देणे हीच जिजाऊ सावित्री यांना खरी आदरांजली देण्यासारखी ठरेल असे प्रतिपादन केले. यावेळी रोहिणी वीर यांनी छत्रपती शिवरायांच्या स्त्री विषयक आदर्श दृष्टिकोनाचे कौतुक करत जिजाऊंनी जसे चारित्र्यवान शिवराय घडवले तशीच आपली बालके मातांनी जिजाऊ सावित्रीच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन घडविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील,संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी आपल्या मनोगतातून जिजाऊंच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत मराठा सेवा संघ महापुरुषांच्या विचारांचा करत असलेल्या प्रचार प्रसार, सामाजिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील यांनी जिजाऊ जन्मोत्सव मराठा सेवा संघाच्या पुढाकारातून आंतरराष्ट्रीय स्वरूपात गेल्या 30 वर्षांपासून साजरा होत असून मराठा सेवा संघाने महापुरुषांच्या विस्मृतीत गेलेल्या इतिहासाला प्रकाशात आणण्याचे काम केल्याचे प्रतिपादन यावेळी बोलताना केले.
यावेळी सई अंकुश सुरवसे या बालिकेने जिजाऊ माँसाहेबांवर सादर केलेल्या छोट्या भाषणाने व वेशभूषेने उपस्थितांची वाहवा मिळवली. गणेश करे पाटील यांनी या बालिकेचे कौतुक करत 1000 रुपये रोख बक्षीस यावेळी दिले.यावेळी मराठा सेवा संघ तालुका संघटकपदी निवड झाल्याबद्दल प्रदीप सरडे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शितोळे यांनी केले तर अजित कणसे यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उदयनराजे वारे,शंभूराजे वारे,दादासाहेब पिसे,विजय दुर्गुळे यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा