*ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आदेशाचे पालन करावे-अन्यथा......? पोनि .राजकुमार केंद्रे*
टेंभुर्णी प्रतिनिधी दि. 17.
भारतामध्ये 15 जानेवारी रोजी मधील सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या गावांमध्ये व पोलीस स्टेशन हद्दीतील गावामध्येखालील प्रमाणे सक्त सूचना देण्यात येत आहेत.
1. विजयी मिरवणूक न काढणे2. रॅली न काढणे
3. फटाके न फोडणे 4. गुलाल न उधळणे 5. विना परवानगी फ्लेक्स/ बॅनर न लावणे.6. मोटर सायकल रॅली कोणीही काढणार नाही.7. मोटरसायकलच्या सायलेन्सर ची पुंगळी कोणी काढणार नाही 8. डॉल्बी डीजे / साऊंड सिस्टिम लावणार नाही.9. सर्व पोलीस पाटील गावात हजर राहून प्रत्येक एक तासाला तसेच संशयित व गोंधळ घालणाऱ्या लोकांना बद्दल तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देतील.
10. पराभव झालेल्या उमेदवाराच्या घरासमोर विजयी उमेदवार अथवा कार्यकर्ते जाणार नाही.
11. मतमोजणीच्या ठिकाणी तहसील कार्यालय यांच्याकडून परवाना असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.
12. मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल अथवा इलेक्ट्रॉनिक वस्तू आत नेण्यास मनाई करण्यात आलेले आहे तरी मोबाईल कोणी घेऊन येणार नाही.
13. मतमोजणीच्या ठिकाणी शासकीय गोडाऊन येथे चारही बाजूने बॅरिकेट करण्यात आले असून सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
14. मत मोजणी वेळी प्रवेश करताना चार ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला पोलीस चेक करून आत प्रवेश देणार आहेत.
15. जे कार्यकर्ते रोडवरती अथवा अनाधिकृतपणे पार्किंग करतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
वरीलप्रमाणे सक्त मनाई आदेश आहेत.
**** *काय चालू राहिला व काय बंद राहील******
दि 18/1/21 सकाळीं *10:00* ते दि 19 सायं. *6:00* पर्यंत सर्व हॉटेल,ढाबे,खानावळी, चायनीज, पान टपरी इ. बंद* राहतील
*सदर आदेशाची अंमलबजावणी कडक केली जाणार आहे*
*तरी सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे अन्यथा अंमलबजावणीचा गैरवापर केल्यास त्यांच्यावर कडक** कारवाई केली जाईल. असे टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी आव्हान केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा