Breaking

बुधवार, २७ जानेवारी, २०२१

उस्मानाबाद, औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर करण्यासाठी हिंदू सेनेचे तुळजापूर तहसीलदारांना निवेदन*



*उस्मानाबाद, औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर करण्यासाठी हिंदू सेनेचे तुळजापूर तहसीलदारांना निवेदन*

*तुळजापूर प्रतिनिधी/ रुपेश डोलारे उस्मानाबाद*

आज हिंदुराष्ट्र सेना तुळजापूर तालुक्याच्या वतीने शहरातून पायी फेरी काढून तहसीलदार मार्फत मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना धाराशिव व संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या नामांतर च्या मागणीचे निवेदन देण्यात आले.*

   सद्याचे शासकीय नाव हे उस्मानाबाद आहे हे नाव पारतंत्र्याची निशाणी असून हा भारतीयांवर गुलामीचा डाग आहे त्यामुळे धाराशिव  नाव करून सरकारने स्वतंत्र भारतात आपण आहोत याची प्रचीती द्यावे असे यात म्हणले आहे.तसेच क्रूर अत्याचारक औरंग्या चे नाव काढून टाकून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे नाव औरंगाबाद जिल्ह्यास सन्मानाने देऊन सर्व राजकीय पक्षांनी आपला छत्रपतींच्या विचाराचा वारसा तोंडी न बोलता खरोखर जपून दाखवण्यात यावा असंही या निवेदनात म्हंटले आहे.
   यापूर्वीही संघटनेच्या वतीने निवेदन देऊन देखील सरकारने दखल न घेतल्यामुळे पुनःश्च एकदा निवेदन देण्यात आल्याचे यावेळी 
हिंदुराष्ट्र सेनेचे पदाधिकारी म्हणाले, व आता दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हिंदुराष्ट्र सेना च्या माध्यमातून देण्यात आला आहे.यावेळी महंत मावजीनाथजी महाराज,महंत व्यंकटअरण्य महाराज संजय दादा सोनवणे. अर्जुन आप्पा साळुंके. परिक्षित साळुंके. सुदर्शन वाघमारे  ओंकार पवार. सुधीर कदम. बापुसाहेब नाईकवाडी. शिवाजी बोधले. गुलचंद व्याव्हारे .अजय भैय्या साळुंके. सागर इंगळे. गणेश जळके.जिवणराजे इंगळे. गिरीश लोहारेकर.दादा भोसले.  व शेकडो हिंदुत्ववादी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा