महिलांनी आपली आर्थिक प्रगती करावी..श्रीमती राठोड
जालना (प्रतिनिधी)मनिषा मगरे
क्रांतिसिंह बहुउद्देशिय सेवाभावी संस्था दरेगाव आणि महिला आर्थिक उन्नती मंडळ रामनगर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिवीर सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य महिला मेळावा घेण्यात आला.या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून श्री.तेजल क्षिरसागर(नाबार्डचे महा प्रबंधक ) , श्रीमती एस.राठोड (पोलीस निरीक्षक महिला तक्रार निवारण केंद्र ) सोपान शेजुळ (वकील), श्रीमती स्वातीताई शेजुळ(सरपंच रामनगर),मनोहर सरोदे,गणेश गव्हाणे,संस्थेचे अध्यक्ष विष्णू पिवळ,उषाताई शिंदे,अयोध्या टेमकर,संतोष थेटे,व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्रीमती राठोड यांनी महिलांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती केली पाहिजे. तसेच महिलांनी कोणत्या गोष्टीला न डगमगता एकमेकीला सहकार्य करत सामोरे गेले पाहिजे यासाठी सर्व कायदे व प्रशासन महिलांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत जर कुठे अन्याय होताना दिसला तर न घाबरता ताबडतोब पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली पाहिजे प्रत्येक महिलांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्याची गरज आहे व मुलींकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन बदलला पाहिजे यासाठी आता खऱ्या अर्थाने आपल्या मुलींना स्वातंत्र्य देण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले. नाबार्डचे सिरसागर यांनी महिलांनी आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम होण्याची गरज असून जास्तीत जास्त उद्योग उभा केले पाहिजे आणि आपली व आपल्या कुटुंबाची आर्थिक प्रगती केली पाहिजे बचत गटाच्या माध्यमातून नुसती बचत करून चालणार नाही तर त्यातून शेती पूरक व्यवसाय उभा करून आपला आर्थिक उदार झाला पाहिजे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विष्णू पिवळ यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा देत संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विविध नवीन उपक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू पिवळ यांनी तर आभार सौ उषाताई शिंदे यांनी केले या कार्यक्रमास अंगणवाडी ताई, आशा वर्कर तसेच बचत गटांच्या अध्यक्ष व सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा