श्री. गायत्री हनुमान करवंदी, च्या माध्यमातून ग्रामविकास व्हावा यासाठी प्रा. दयानंद भाऊराव जाधव यांची मुंबई येथे महापुरुषांच्या समाधी स्थळी भेट*
*लातूर जिल्हा प्रतिनिधी /जीवन भोसले,*
*लातूर*(ता. उदगीर )ग्रामपंचायत निवडणुकीत श्री. गायत्री हनुमान ग्रामविकास पॅनल चा दणदणीत विजय झाला, त्याचे निमित्य साधून प्रा. दयानंद भाऊराव जाधव यांनी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधी स्थळ (चैत्य भूमी दादर, मुंबई ) आणि मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळी ( छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर ) येथे भेट दिली.
प्रा. दयानंद जाधव करवंदी गावाच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर असतात, त्यांनी गावच्या विकासासाठी महापुरुषांना अभिवादन करून आशीर्वाद घेतला आणि विकास व्हावा म्हणून प्रार्थना केली. " येणारा काळ नक्कीच गावाच्या विकासासाठी असेल आणि गावाच्या प्रगती साठी थेट मंत्रालयातून योजना आखण्यात येतील" असा विश्वास प्रा. दयानंद जाधव यांनी आमच्या प्रतिनिधिकडे दिल्याला प्रतिक्रियेत सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा