Breaking

गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

करवंदी ग्रामपंचायत सरपंच पदी माजी सरपंच कै.भाऊराव जाधव यांच्या पत्नी श्रीमती कौशल्याआई भाऊराव जाधव यांची बिनविरोध निवड



*करवंदी ग्रामपंचायत सरपंच पदी  माजी सरपंच कै.भाऊराव जाधव यांच्या पत्नी श्रीमती कौशल्याआई भाऊराव जाधव यांची बिनविरोध निवड*

*लातूर जिल्हा प्रतिनिधि /जीवन भोसले,* 

लातूर, (ता. उदगीर)येथिल करवंदी ग्रामपंचायत मध्ये दिनांक 11.02.2021 रोजी सरपंच आणि उपसरपंच निवड कार्येक्रम संपन्न झाला.
नवनिर्वाचित निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य श्रीमती  कौशल्या भाऊराव जाधव,रमाबाई सुग्रीव सूर्यवंशी, विनायक गोरोबा गायकवाड, शाहू चव्हाण, शालूबाई मारोती नरवटे, सत्यवान बिरादार, रेखा बावगे हे होते.
कै. भाऊराव जाधव यांच्या पॅनल चे 5 सदस्य आणि ग्रामविकास पॅनल आणि अपक्ष पॅनल चा प्रत्येकी 1 सदस्य निवडून आले होते.

सकाळी 10 वाजता निवड प्रकिर्येला सुरवात झाली.
कै. भाऊराव जाधव ग्रामविकास पॅनल चे पाच ही सदस्य या निवडीसाठी हजर राहिले आणि सर्वानुमते  सरपंच पदी श्रीमती कौशल्या भाऊराव जाधव यांची  आणि उपसरपंच पदी शाहू सुनील चव्हाण यांची बिनविरोध वर्णी लागली.

 निवडणूक अभ्यासि अधिकारी पाटिल सर  आणि ग्रामसेवक कांबळे सर यांनी निवड प्रकिर्येचे काम पाहीले.

निवड झाल्यानंतर ग्रामविकास पॅनल च्या विजयासाठी दिवस-रात्र परिश्रम घेतलेल्या लोकांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
माजी विस्तार अधिकार आर. डी. जाधव,भालेराव जाधव, प्रा. दयानंद जाधव,रामप्रसाद पाटिल,विजयकुमार चव्हाण, सुग्रीव सूर्यवंशी, तंटा मुक्ती अध्यक्ष मारोती नरवटे,जयवंत सूर्यवंशी,माजी सरपंच गंगाधर बिरादार, वैजनाथ सूर्यवंशी, परमेश्वर गायकवाड, संकटअप्पा सूर्यवंशी,पत्रकार प्रवीण सूर्यवंशी,भीम गायकवाड, वसंत सूर्यवंशी, सुरेखा संदीप जाधव, दीपाली पाटिल,मुक्ता जाधव,प्रभावती जाधव, बाळासाहेब जाधव, अजित जाधव, ज्ञानेश्वर जाधव,साहेबा वाघे,श्रीनिवास जाधव,केशव जाधव, अंगद जाधव,संदीपान सूर्यवंशी, मोहन बिरादार,राजू सुमठाणे आदी मान्यवर या कार्येक्रमासाठी उपस्थित होते.
सरपंच कौशल्याआई भाऊराव जाधव यांनी सर्व करवंदी करांचे आभार मानले, आणि "येणारा काळ करवंदी गावाच्या प्रगतीचा असेल,गावातील आरोग्य, शिक्षण, शेती विषयक विकास, पशुधन सुधारणा विकास, शुद्ध पाणी,स्वच्छता,बंदिस्त नाल्याची वेवस्था,दिवाबत्ती ची सोय ,निराधारांसाठी योजना, दिव्यांगासाठी योजना,शरद पवार कृषी संजीवनी योजना,दलित वस्ती सुधारणा योजना, इत्यादी च्या माध्यमातून विकास कामावर विशेष लक्ष दिले जाईल आणि विकासकामासाठी  सर्वांना विचारात घेऊन कामे केले जातील. शासनाकाडे योग्य पाठपुरावा करून गावचा विकास केला जाईल आणि येणाऱ्या पाच वर्षात करवंदी गाव एक आदर्श गाव म्हणून नावारूपाला येईल" असा विश्वास व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा