Breaking

सोमवार, १ मार्च, २०२१

विठ्ठल राव शिंदे साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता... 14 लाख 55 हजार 555 व्या साखर पोत्याचे पूजन*. *पंधरा दिवसाला शेतकऱ्यांचे बिल देणारा कारखाना. पुढील हंगामात 25 लाख टन गाळपाचे उद्दिष्ट............आ.बबनदादा शिंदे



विठ्ठल राव शिंदे साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता... 14 लाख 55 हजार 555 व्या साखर पोत्याचे पूजन

 *पंधरा दिवसाला शेतकऱ्यांचे बिल देणारा कारखाना. पुढील हंगामात 25 लाख टन गाळपाचे उद्दिष्ट............. आ.बबनदादा शिंदे*

बेंबळे प्रतिनिधी।                     
माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील
   विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामाची सांगता आज सकाळी 11 वाजता करण्यात आली असून 14 लाख 55 हजार 555 व्या साखर पोत्याचे पूजन करण्यात आले.
 प्रथम काटा पूजन करण्यात आले त्यानंतर कारखान्याचे नूतन उपाध्यक्ष वामन भाऊ उबाळे व संचालक वेताळ  जाधव यांचे हस्ते 14 लाख 55 हजार 555 व्या साखर  पोत्याचे पूजन करण्यात आले.
          याप्रसंगी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की चालू गळीत हंगामात 129 दिवसात पिंपळनेर युनिट.. एक.. मध्ये 14 लाख 89 हजार 787 टन उसाचे गाळप करून 14 लाख 56 हजार 900 क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे ,रिकव्हरी 11.20 अशी आहे. आमचे करकंब युनिट 2 मध्ये 112 दिवसात तीन लाख 83 हजार 538 टन गाळप ऊसाचे गाळप करून 4 लाख15 हजार309 क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले आहे ,रिकवरी 10 .83 अशी आहे. दोन्ही युनिट मध्ये एकूण 18 लाख 73 हजार 325 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 18 लाख 72 हजार 290 क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे., कारखान्याची रिकव्हरी जिल्ह्यात दोन नंबर वर आहे. आर्थिक अडचणी असून देखील 30 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांचं 2000 रुपये प्रति टन प्रमाणे चे बिल देण्यात आले आहे., आमच्या कारखान्याची एफ आर पी 2375 रुपये आहे तसेच प्रत्येक पंधरा दिवसाला शेतकऱ्यांच्या उसाचे बिल काढणारा कारखाना म्हणून कारखान्याची सर्वत्र नोंद आहे.

             आमदार शिंदे पुढे म्हणाले की साखर उद्योग प्रचंड अडचणीत आहे ,शासनाला विकलेली साखर , निर्यात केलेली वीज व इथेनॉलचे एकुण  63 कोटी रुपये शासनाकडून येणे बाकी आहे, तरीही कामगार, ट्रॅक्टर ,बैलगाड्या व इतर सर्व प्रकारची  देणी  दिलेली आहेत. केंद्र सरकारने 3100 रुपये क्विंटल साखर विक्रीस परवानगी दिली आहे परंतु केंद्र व राज्य सरकारने विचार करून 3500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे साखर विक्री करण्याचे धोरण अवलंबावे तरच राज्यातील साखर उद्योगांना काहीसा दिलासा मिळेल.
     पुढील 2021--2022 हंगामासाठी 25 हजार हेक्टर उसाची नोंद कारखान्याकडे असून पुढील हंगामात 25 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचा कारखान्याचा उद्देश आहे .यापुढे उसापासून डायरेक्ट इथेनॉल निर्मितीवर जास्त भर देण्याचा आमचा मानस आहे, या साठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
        प्रास्ताविक मध्ये कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी गळीत हंगामाचा आढावा सादर केला आणि  सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद धन्यवाद दिले. या कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष वामन भाऊ उबाळे, संचालक पोपट गायकवाड, विष्णू हुंबे, पोपट चव्हाण, लाला मोरे ,नीलकंठ पाटील, सुरेश बागल, संदीप पाटील ,पांडुरंग घाडगे ,वेताळअण्णा जाधव तसेच कारखान्यातील विभाग प्रमुख संभाजी थिटे, सी एस भोगाडे, पोपटराव येलपले, सुनील बंडगर, सुनील शिंदे, पांडुरंग बागल, फारूक दुंगे, जगदीश देवडकर व शशिकांत पवार आधी विभाग प्रमुख उपस्थित होते.शेवटी संचालक वेताळ अण्णा जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा