विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने संपन्न
साखरेची 3500 रुपये क्विंटल आधारभूत किंमत असावी...
.... साखर कारखानदारी अडचणीत.... आमदार बबनदादा शिंदे
पुढील हंगामात दररोज तीन लाख लिटर इथेनॉल निर्मिती..
एफआरपी वाढली तसेच साखरेचे भाव पण वाढले पाहिजेत .....................आमदार बबनदादा शिंदे
बेंबळे। प्रतिनिधी।
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची सन २०१९-२० आर्थिक वर्षाची २१ वी ऑनलाइन अधिमंडळ वार्षिक सर्व साधारण सभा कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आ.बबनराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ३० मार्च रोजी सकाळी ११ वा.कारखाना कार्यस्थळावर ऑनलाइन पद्धतीने उत्साहात संपन्न झाली. यावेळी उपाध्यक्ष वामनभाऊ ऊबाळे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
स्वागत, प्रस्तावीक व विषय पत्रिकेचे वाचन प्र.कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी केले.अनुक्रमे 1 ते 18 ठराव एकमताने मंजुर करणेत आले. बहुतांशी सभासदांनी आनलाईन पद्धतीने सहभाग नोंदविला.
अध्यक्षिय भाषणात आ.शिंदे म्हणाले की, केंद्र शासनाने 3500 रुपये प्रति क्विंटल साखरेचे आधारभुत किंमत करणे आवश्यक आहे, तरच ऊसाची आधारभुत किंमत देणे कारखान्यांना शक्य होईल. अन्यथा कारखाने कर्ज व त्यावरील व्याज यामुळे अडचणीत येतील. मागील हंगामात केंद्र शासनाने साखरेचे उत्पादन जास्त झालेमुळे निर्यात साखरेस अनुदान देणेचे धोरण निश्चित केल्यामुळे याचा फायदा कारखान्याना एफ.आर.पी. देणेसाठी झालेला आहे. तरीही अनुदानाचे 74 कोटी रुपये कारखान्यास येणे बाकी आहे.,साखर कारखानदारी अत्यंत अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात शेतकऱ्यांना प्रतिटन दोन हजार रुपये ॲडव्हान्स दिलेला आहे.तसेच उसाचे सर्व पेमेंट बँकेत जमा केलेले आहे.केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या साखर निर्यात कोट्या प्रमाणे साखर विक्री झालेली आहे,. आणखी ६ लाख पोती साखर निर्यात करण्याचा प्रयत्न आहे.
पुढील हंगामात नवीन धोरणाप्रमाणे सुरुवाती पासून इथेनॉल निर्मितीस प्राधान्य राहील.दररोज तीन लाख लिटर इथेनॉल तयार करणार आहोत.६ कोटी ७५ लाख युनिट वीज निर्यात केली आहे.चालू हंगामात दोन्ही युनिटचे मिळून १९ लाख मे.टन गाळप झाले आहे.भविष्यात नवीन काय करण्याचे धोरण नाही.मात्र डिस्टलरी प्रकल्प आणखी वाढवून इथेनॉल कसे वाढेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ.बबनराव शिंदे यांनी सांगितले ते म्हणाले की,एफआरपी वाढत राहिली पण साखरेचे भाव वाढले नाहीत जिल्ह्यातील ९० टक्के साखर कारखानदारी अडचणीत सापडली आहे .तसेच साखर कारखान्याच्या प्रगतीच्या दृष्टीने जे जे करणे गरजेचे आहे ते ते करण्याचा प्रयत्न राहील असे शेवटी आ.शिंदे सांगितले. उपस्थितांचे आभार संचालक सुरेश बागल यांनी मानले.
या सभेस संचालक वेताळ जाधव,रमेश येवले-पाटील,विष्णू हुंबे,लक्ष्मण खूपसे,पोपट चव्हाण,शिवाजी डोके,पांडुरंग घाडगे,पोपट गायकवाड,सुरेश बागल,सचिन देशमुख,सिंधुताई नागटिळक,लाला मोरे,सुभाष नागटिळक हे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित होते.
तसेच वर्क्स मॅनेजर सी.एस.भोगडे,मुख्य रसायनी पी.एस.येलपले, फायनान्स मॅनेजर डी.व्ही.लव्हटे, डिस्टलरी मॅनेजर पी.व्ही.बागल,मुख्य शेतकी अधिकारी एस.पी.थिटे,सिव्हिल इंजिनिअर एस.आर.शिंदे,मार्केटिंग मॅनेजर.एन.एम.नायकुडे, हेड टाईम कीपर आर.एन.आतार,सुरक्षा अधिकारी एफ.एम.दुंगे हे अधिकारी,परचेस आफिसर जे.डी.देवडकर,कामगार प्रतिनिधी अनिल वीर यांनी आनलाईन सहभाग घेतला. शेवटी राष्ट्रगिताने सभेची सांगता करणेत आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा