राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सीना माढा योजनेकरीता 50 कोटी रुपयांची तरतूद--- आमदार बबनदादा शिंदे यांची माहिती..
राज्य सरकारने काल विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला असून यामध्ये प्रामुख्याने माढा तालुक्यातील सिना माढा उपसा जलसिंचन योजनेच्या प्रकल्पासाठी उप मुखयमंत्री अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी 50 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की माढा तालुक्यासाठी वरदायिनी ठरलेली सिना माढा योजना ही कार्यान्वित झालेली योजना असून यामध्ये मुख्य कालवा पाईप लाईन वितरिका PDN बंद नलिका प्रणाली द्वारे भिजनारे क्षेत्र आवश्यक त्या ठिकाणी पुल आदी कामे झालेली आहेत या योजनेवरील आजपर्यंत जवळपास 12500 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आलेले असल्यामुळे तालुक्यातील सिंचन क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे.
सिना माढा योजनेबद्दल बोलताना आ. शिंदे म्हणाले की या योजनेतील कामे आता अंतिम टप्प्यात आलेली असून प्रकल्पाच्या उर्वरित राहिलेल्या कामासाठी निधीची तरतूद करण्याबाबत राज्याचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यांची भेट घेऊन मागणी केलेली होती त्या अनुषंगाने राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये 50 कोटी रुपयांची भरीव तरतूद केल्याने या निधीतून राहिलेले पोटफाटे या बरोबरच मुख्य कॅनॉल ज्या ठिकाणी जास्त प्रमाणावर पाझरत आहेत तेथे लायनिंग करणे, नवीन गेट बसविणे, जुन्या गेटच्या दुरुस्त्या PDN मधील उर्वरित कामे हि पूर्ण होणार आहेत. त्यामुळे पुढील काळात सिना माढा योजनेचे राहिलेले उर्वरीत क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे याच बरोबर शेतकऱ्यांच्या जमिनीचा भूसंपादन मोबदला मिळणेसाठी कार्यकारी अभियंता भिमानागर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा काही अडचण असल्यास माझेशी संपर्क करावा असेही आ.शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
चौकट-
राज्यातील एकमेव योजना
राज्यातील अनेक उपसा सिंचन योजना या नियोजनाच्या अभावामुळे बंद पडलेल्या अवस्थेत आहेत.
मात्र राज्यशासनाच्या ताब्यातील सिना माढा उपसा सिंचन ही शेतकऱ्यांच्या विकासासाठी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने पुढाकार घेवून चालविलेली आहे हि सुमारे 16500 हेक्टर क्षेत्राला सिंचनाखाली आणणारी महत्वकांक्षी योजना असून यामधील आतापर्यंत 12500 हेक्टर क्षेत्राला पाणी मिळाल्यामुळे दुष्काळी माढा तालुक्याचा कायापालट होण्यास मदत झालेली आहे. उर्वरित राहिलेल्या चार हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणेसाठी चालु वर्षी 50 कोटी रुपयांचा निधीची अर्थसंकल्पामध्ये तरतुद केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आभार मानतो तसेच या योजनेत बावी तुळशी अंजनगाव खे. परितेवाडी या गावांचा समावेश होणेसाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेकडे बैठक लावणार आहे.
आ.बबनराव शिंदे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा