*भाजी विक्रेते व फळ विक्रेते यांना त्रास झाला तर तहसील,नगर, परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत कार्यालयात बाजार भरू- सुनील ठोसर*
गेवराई प्रतिनिधी- नवनाथ आडे
सध्याच्या परिस्थितीत कोरोना या सर्व नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी यशस्वी होईल याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न देता केवळ शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असताना नुसते आडमुठे धोरण स्वीकारले असल्याचे शेतकरी फळ विक्रेते, भाजी विक्रेते, पाले भाज्या विक्रेते यांचेकडून रयत शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी यांच्या कडे मागणी केली आहे येवढ्या मेहनतीने उत्पादित केलेल्या मालाची, खर्चाची, उपजिविकेची जबाबदारी प्रामाणिक सरकार व प्रशासनाची जबाबदारी पार पाडावी यासाठी सर्व यंत्रणा व विभाग जबाबदार असून शासनाचे आदेश सर्वोतोपरी पालन करू! मायबाप सरकारने आम्हाला नियमाला अधीन राहून सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे कोरोना १४४ व आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करत शेतकरी व सर्व शेतीमाल विक्री करणाऱ्या हातावर पोट असणाऱ्या व्यक्ती सर्वांना प्रशासनाने तातडीने सहकार्य करावे अशी मागणी रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर यांच्या वतीने करण्यात येत आहे नियमांचे पालन न करणाऱ्या दोषी वर कार्यवाही करावी पण नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणार आहेत अशा सर्वांना प्रशासनाने सहकार्य करावे अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून बोलले जात आहे यावेळी उपस्थित प्रमोद डोंगरे, प्रदीप झोडगे, गणेश ढाकणे, सुधीर भोसले, लता पंडित, बाळराजे जाधव, गणेश चव्हाण, गुरु, सचिन शिंदे, नवनाथ भाऊ आडे, संतोष गायकवाड, किरण गायकवाड, राजू मोरे,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा