उजनीतून २१ तारखेला कालवा तर भीमा नदीला २३ तारखेला सुटणार ..... आ.बबनदादा शिंदे
बेंबळे। प्रतिनिधी
उजनी धरणातून कालव्याला २०ते २१ तारखेला तर भीमा नदीला २३ तारखेला उन्हाळी आवर्तन सुटणार असल्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे आमदार बबनराव शिंदे यांनी आग्रही मागणी केल्याने त्यांनी पाणी सोडण्याचे मान्य केले तर याबरोबरच सीना नदी, सीना माढा उपसा सिंचन या योजनांना देखील पाणी सोडले जाणार आहे.
उन्हाळ्याची तीव्रता सध्या जाणवू लागलेमुळे कालव्याला व नदीला पाणी मागणी वाढु लागलेली आहे प्रत्येक भागातून शेतकरी आ.शिंदे यांना पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी करत होते.त्यातच शेतकर्यांना गेली वर्षभर कोरोणामुळे प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागतोय शेतमालाला योग्य प्रमाणात भाव मिळत नाही.मार्च महिना लागल्याने उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याअभावी शेतातील पिके करपू लागली होती.त्यामुळे आ. बबनराव शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पाठपुरावा केला व या मागणीला यश मिळाले त्यामुळे शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे.
उजनी धरणामधे सद्यस्थितीला ६४ टक्के पाणी साठा असून धरणात पाणी मुबलक असल्याने शेतकऱ्यांना पिकांना फायदा व्हावा अशी आमची आपेक्षा आहे.या पाण्यामुळे ऊस,केळी,द्राक्ष,मका,भुईमूग,मुग या पिकांना फायदा होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.हे आवर्तन मार्च ते एप्रिल या महिन्यात देण्यात येणार असून हे आवर्तन संपल्यावर उन्हाळी हंगामात दुसरे आवर्तनही सोडण्यात येणार असल्याचे आ. बबनराव शिंदे यांनी सांगितले त्यामुळे चालू उन्हाळी हंगामाची शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा