Breaking

रविवार, १४ मार्च, २०२१

बेंबळे गावात कोरोनाची लागण . लॉकडाउन करुन गाव बंद ठेवण्याचा विचार ... सरपंच विजय पवार



बेंबळे गावात कोरोनाची लागण . लॉकडाउन करुन गाव बंद ठेवण्याचा विचार ... सरपंच  विजय पवार
                                           
       
      बेंबळे। प्रतिनिधी।            
            बेंबळे येथे कोरोनाचे रुग्ण पुन्हा दिसून येऊ लागले असून नागरिकांनी " माझे घर ,माझा गाव माझी जबाबदारी "या तत्त्वानुसार काळजीपूर्वक वर्तणूक ठेवावी अन्यथा सर्वांच्या विचाराने पुन्हा पूर्वीसारखे संपूर्ण गाव व परिसरातील वाड्या-वस्त्या मधील सर्व व्यवहार  बंद ठेवून लाँकडाऊन च्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागेल असे प्रतिपादन बेंबळे गावचे सरपंच विजय पवार यांनी व्यक्त केले आहे., या प्रसंगी काही प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते .
                       वृत्तांत असा की मागील तीन-चार दिवसांमध्ये  बेंबळे गावात पुन्हा कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येऊ लागले आहेत, त्यांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. यापूर्वी 2020 च्या जुलै ,ऑगस्ट मध्ये बेंबळे -हरिनगर- भोसलेवाडी- काळेवस्ती येथे एकूण 43 कोरोना रुग्ण  दिसून आले होते,व  यापैकी १३जणांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये सोपानराव आटकळे, जगन्नाथ कुलकर्णी, मच्छिंद्र भोसले अशा कांही मान्यवरांचा समावेश होता.  मागील चार महिन्यापासून कोरोना महामारी चे संकट थोडे कमी झाल्यामुळे पुन्हा बरेच व्यवहार व्यवस्थित सुरळीत चालू असताना अचानक या पंधरा दिवसात पुन्हा कोरोना ची लक्षणे असलेले रुग्ण दिसून येऊ लागले आहेत. याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ नये म्हणून 11000 लोकसंख्या आसलेल्या बेंबळेकरांनी स्वतःची, कुटुंबाची व गावाची काळजी घेतली पाहिजे असे पवार यांनी सांगितले. यासाठी लहान-थोर स्त्री-पुरूष सर्व मंडळींनी मास्क वापरला पाहिजे, कामाशिवाय बाहेर किंवा परगावी न गेले पाहिजे,सर्वत्र स्वच्छता राखली पाहिजे, सोशल डिस्टंसिंगचा कटाक्षाने वापर केला पाहिजे तसेच नागरिकांच्या मर्यादित संख्येत कोणतेही कार्यक्रम पार पाडले पाहिजेत .सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून  कोविडचे लसीकरण केले जात आहे ही  भाग्यवर्धक बाब असून वयोमानानुसार प्रत्येकाने लसीकरण करून घेतले पाहिजे अशी आग्रही सूचनाही सरपंच पवार यांनी केली आहे .येत्या दोन किंवा तीन दिवसांमध्ये नागरिकांनी स्वखुशीने सर्व नियमाचे पालन करणे सुरु करावे अन्यथा पोलीस स्टेशनच्या सहकाऱ्यांने गाव बंद केले जाईल, आठवडा बाजार , सर्व बाजारपेठा, बँका, शाळा-कॉलेज ,एकत्रित होत असलेले सार्वजनिक कार्यक्रम , व सर्व व्यवहार सक्तीने बंद केले जातील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलीस स्टेशनच्या सहकाऱ्यांने कठोर कारवाई केली जाईल. सर्दी, ताप ,खोकला ,पडसे , श्वास घेण्यास त्रास अशी कांही लक्षणे दिसताच, दुखणे अंगावर न काढता प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना ची टेस्ट करुन घ्यावी व सुरक्षित राहावे असे आवाहन पवार यांनी केले आहे.

                  लवकरच गावांमध्ये सर्वत्र जंतुनाशक फवारणी करण्यात येणार आहे तसेच कोरोना बद्दल काळजी घेण्याचे घराघरातून पुन्हा आव्हान करण्यात येत आहे असेही सरपंच पवार यांनी आवर्जून सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा