सहा तासाचा अल्टीमेट अन्यथा अधिकाऱ्यांची विज खंडीत करू-अतुल खुपसे पाटील
श्रीगोंदा-नितीन रोही,
करमाळा तालुक्यातील शेती पंपाची विज खंडीत केल्यामुळे अतुल खुपसे पाटिल यांनी शेतकरयासह ठिय्या आंदोलन केले महावितरण कडून राज्यभर थकीत वीज बील वसूली मोहीम राबवली जात आहे. या अतंर्गत कृषी पंपांची वीज कपात केली जात आहे. त्या संदर्भात आज श्री अतुल खुपसे-पाटील यांनी करमाळा महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन दिले, यावेळी अतुल खुपसे-पाटील म्हणाले की तुम्हाला जर वसुलीच करायची असेल पावसाळ्यात करा अशा प्रकारे शेतकर्यांची अडवणूक करुन वसूली करू नका.आज सकाळीच पाचशे ते सातशे शेतकरी घेऊन अतुल खुपसे पारेवाडी येथून करमाळा तहसीलदार यांना निवेदण देऊण विदयुत महावितरण करमाळा या ठिकाणी ठिय्या मारून बसले यावेळी बोलताना खुपसे पाटिल म्हणाले
वसूली बंद करा अन्यथा आत्महत्ये शिवाय पर्याय नाही
महावितरण कडून जर वसूली मोहीम बंद करण्यात नाही आली तर शेतकर्यांसमोर आत्महत्ये शिवाय पर्यायच उरला नाही. पोटच्या मुलांसारखे वाढवलेले पीक डोळ्यासमोर जळताना कोणताही शेतकरी पाहू शकत नाही. त्यामुळे यावर महावितरणने गांभीर्याने विचार करावा.
ऐका बाजूने कोरोनाने शेतकऱ्याचे कंबरड मोडले आसताना कारखान्यानेने ऊस बील दिले नाही अचानक पणे विज कपातीचा निर्णय घेतातत आणी शेतकरयाचा हाता तोंडातील घास काढून घेण्याचे काम ह्या सरकारने केले आहे यावेळी जर सहा तासात विज सुरळीत केली नाही तर शेतकरयासह अधिकाऱ्याच्या घराची आणी ऑफिसची विज बंद करू आणी शेती पंपाची विज चालू करण्याचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराच खुपसे पाटिल यांनी दिला
चौकट
यावेळेस करमाळा पोलिस ठाण्याचे पि आय श्रीकांत पाडुळे यांनी आंदोलनाचे निवेदण देण्यासाठी गेलेल्या शेतकर्यांना पाडुळे नी दमबाजी करत अतुल खुपसे सोबत का आंदोलनात आला म्हणून विनोद बाबर हिंगणी, नवले पारेवाडी, आदिनाथ फासे, भगतवाडी,या शेतकरयांना
तब्बल दोन तास डांबून ठेवले आणी त्याचे मोबाईल पण काढून घेतले नंतर खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी फोन केल्यावर त्याना सोडण्यात आले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा