Breaking

बुधवार, ३ मार्च, २०२१

देश वाचवायचा असेल तर राजकीय घराणेशाही हटवा" - संपत गारगोटे*



*"देश वाचवायचा असेल तर राजकीय घराणेशाही हटवा" - संपत गारगोटे*

*करमाळा तालुका प्रतिनिधी - अतुल वारे पाटील* 
राजकिय घरणेशाहीमुळे देश पारतंत्र्यात ढकलला जात असून देशाला वाचवायचे असेल तर राजकीय घराणेशाही संपवायची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते संपत गारगोटे यांनी लव्हे ता करमाळा येथे शिवजयंती निमीत्त आयोजित व्याख्यान प्रसंगी बोलताना केले.
          शिवजयंती निमित्त छत्रपती युवा प्रतिष्ठाण व लव्हे ग्रामस्थांच्या वतीने व्याख्याते संपतराव गारगोटे यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माँ शरदाश्रमचे आनंदयोगी महाराज, पंचायत समितीचे सदस्य व सरपंच विलास दादा पाटील, पंचायत समितीचे सदस्य अतुलभाऊ पाटील, नेते राजू आण्णा पाटील, महाराष्ट्र केसरी चंद्रहास बापू निमगिरे, संभाजी ब्रिगेड चे पुणे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके, सामाजिक कार्यकर्ते नागेश कांबळे, सत्यम सूर्यवंशी, संभाजी ब्रिगेडचे भाऊसाहेब साबळे,नेते माणिक दादा पाटील,शेटफळचे सरपंच विकास गुंड आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले तसेच मान्यवरांना पुस्तके भेट देऊन गौरविण्यात आले.प्रथम कु.साक्षी बाळू खबाले हिने उपस्थित जनसमुदायापुढे आपले विचार व्यक्त केले. युवा वक्ते बाळासाहेब तोरमल यांनी आपल्या पहाडी आवाजात शिव विचार मांडले. त्यांनी सद्य स्थितीवर मार्मिक विचार मांडून उपस्थितांची मने जिंकली. त्यांनंतर व्याख्याते संपतराव गारगोटे यांनी आपल्या जोरदार व्याख्यानातून उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले,शिवराय हे डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन जगलो पाहिजे आणि या देशात शिवराज्य निर्माण झाले पाहिजे मात्र या साठी देशातील राजकीय घराणेशाही उखडून फेकली पाहिजे. या व्याख्यानात त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. व सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारा अंगिकारल्या शिवाय गत्यंतर नसल्याचे सांगितले.आपला पहाडीआवाज,,सुसूत्रता व अभ्यासपूर्ण मांडणी  या मुळे वक्त्याने उपस्थिती लोकांची वाहवा मिळवली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर वलटे यांनी केले व्याख्याना नंतर सर्वांसाठी सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा