***************जागतिक महिला दिन* ***********
*जिजाऊंचे विचार प्रत्येक महिलांनी आचरणात आणले तर खरा महिला दिन साजरा होईल .....शोभा साळवे मुंबईकर*
लातूर जिल्हा प्रतिनिधि / जीवन भोसले,
स्वराज्याच स्वप्न आपल्या उराशी बाळगून महान झाली अशी ती जिजामाता म्हणजे आपली सगळ्यांची जिजाऊ माई जातिव्यवस्थेने आणि मनुस्मृतीने महिलांना शुद्र अतिशूद्र वागणूक दिली महिलांना सगळ्यातून अधिकारातून वंचित केलं पण या सगळ्या रूढी-परंपरांना लाथाडून समानतेचं बिजरोल ते म्हणजे जिजाऊंनी ब्राह्मणी पितृसत्ता ग्रासलेल्या जगात जिकडे महिला आणि मुलींची कोणी छेड काढली तर दोष हा महिलेचा आहे अस म्हंटल जात आणि तिनी कस जगावं कस राहावं हयचे धडे दिले जातात पण जिजाऊंनी महिलांचा मान सन्मान करणं मुलींना ना समजवण्या पेक्षा त्यांनी आपल्या मुलाला ती शकवन दिली शिवाजी महाराजांना शिकवलं. ज्या समाजात महिलांना घरात बोलण्याचा अधिकार नव्हता तो सन्मान करायला जिजाऊ नी शिवरायांना शिकवण दिली आजच्या परिस्थितीत मधील जिजाऊ मातेला डोळ्यासमोर ठेवून त्याचा सारख जागण्याचा जगलं पाहिजे हीच सर्वात मोठे जिजाऊंना अभिवादन जिजाऊ सावित्री रमाई यांच्या विचारावर चालत राहणे हाच खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होनार आहे, असल्याचे-शोभा साळवे ( मुंबई ) त्यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा