जागतिक महिला दिनी सुवर्णा आर्वे यांनी केले स्मशानभूमीत वृक्षारोपण
माळशिरस प्रतिनिधी भाग्यावंत ल. नायकुडे
जागतिक महिला दिनानिमित्त सौ सुवर्णा आर्वे यांनी वीरशैव लिंगायत समाजाच्या 'कैलास स्मशानभूमी' येथे जाऊन वृक्षारोपण करीत समाजातील महिलांना वेगळाच आदर्श निर्माण करून दिला
जागतिक महिला दिनी महिलांनी आधिकारा बरोबरच कर्तव्याचेही भाध ठेवावे, समाजाप्रती आपलेही काही कर्तव्य असून त्यांनी ते चोखपणे पार पडावे हे आपल्या कृतीतून सुवर्णा आर्वे यांनी दाखवून दिले.सद्या पर्यावरणाचा र्हास, जागतिक तपमानात वाढ याविषयी समाजमाध्यमातून वारंवार उहापोह होत असतो. पर्यावरणाचा र्हास, जागतिक तपमानात वाढ रोखण्यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन गरजेचे आहे. यासाठी अनेक स्थरावर प्रयत्न केले जातात याच प्रयत्नात आपलाही खारीचा वाटा म्हणून आपल्या घराच्या आवारासह अनेक ठिकाणच्या वृक्षारोपणात सहभाग नोंदविला. त्याचप्रमाणे त्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त वीरशैव लिंगायत समाजाच्या 'कैलास स्मशानभूमी' येथे जाऊन वृक्षारोपण केले आणि समाजातील महिलांना वेगळाच आदर्श निर्माण करून दिला
अकलूज येथील लिंगायत स्मशानभूमीची दुरावस्था झालेली पाहून काही तरुणांनी एकत्र येऊन त्या स्मशानभूमीचा कायापालट करण्याचे ठरवले. हे सर्वजन तेथे दररोज श्रमदान करीत होते. यामध्ये सुवर्णा आर्वे यांचे पती नितीन आर्वे ही सहभागी होते पतीच्या खांद्याला खांदा लावून आपणही काहीतरी करावे या उद्देशाने प्रेरित होऊन स्वतः स्मशानभूमीत जाऊन श्रमदान करण्याची प्रबळ इच्छा होती त्याला आज महिला दिनानिमित्त मूर्त स्वरूप मिळाले. त्यांनी स्मशानभूमीत येऊन वृक्षारोपण करणार असल्याची इच्छा पतीजवळ बोलून दाखवली. त्यांच्या पतीनीही लगेचच त्यास होकार दिला. आणि दोघांनी स्मशानभुमीत जाऊन वृक्षारोपण केले.
आपल्या प्रमाणेच इतर महिलांनीही पुढे येत प्रदूषण जागतिक तपमाणवाढ आदी प्रश्नाबाबत स्वतःपासून सुरूवात करावी. जर एखादी स्त्री एखादा वसा घेऊन बाहेर पडली तर तिला हजारो स्त्रियांचे बळ मिळते म्हणून आपण या कार्यास सुरुवात केली असून स्मशानभूमी बरोबरच अकलूजमध्ये विविध भागात वृक्षारोपण व्हावं आणि प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग पासून बचाव व्हावा अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली
यावेळी वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष अशोक शेटे उपाध्यक्ष विलास क्षिरसागर , सचिव नागेश लिगाडे, खजिनदार व लिंगायत स्मशानभूमी जीर्णोद्धार समितीचे मलिकार्जूण (पिंटू) वैद्य -देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून प्राजक्ता वैद्य-देशमुख व संग्रामनगर ग्रामपंचायत सदस्या स्वाती वैद्य- देशमुख यांनी कैलास स्मशानभूमीत संपूर्ण ठिबक सिंचन करून देनेचा संकल्प केला असून प्राजक्ता वेद्य व स्वाती वैद्य यांंच्या कुटुंबीयांनीही त्यास आनुमती देत रविवार (ता.१४) रोजी ठिबक सिचन करणार असल्याचे जाहीर केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा