बंजारा समाजाचे देशपातळीवरील नेते काशिनाथ नायक यांच्या निधनामुळे समाज एका बुद्धीजीवी नेत्याला मुकला -बी एम पवार
बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे
देशभरातील आणि देशाबाहेरील बंजारा समाजाला एका छत्राखाली आणण्यासाठी आयुष्य वेचनारे कांशीनाथ नायक यांच्या दुःखद निधनामुळे बंजारा समाज एका बुद्धीजीवी नेत्याला मुकला आहे अशा भावना सेवालाल सेना संस्थापक अध्यक्ष बी एम पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.
या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, काशिनाथ नायक यांनी देशातील आणि देशाबाहेरील बंजारा समाजाला एकत्र करून सामाजिक चळवळ उभी केली, गोर शिकवाडी आणि गोर सेना या दोन सामाजिक संघटना त्यांनी निर्माण केली आणि हळुहळू देशभरात या संघटनेचे जाळे निर्माण केले.
समाजाच्या व्यथा मांडल्या, समाजाची दशा तरुणासमोर मांडली आणि त्याला दिशा दाखविणारे विचार दिले. समाजातील तरुण आणि बुद्धीजीवी लोकांना एकत्र करून त्यांचे केडर कॅम्पस घेऊन त्यांना वैचारिक बैठक उपलब्ध करून दिली.
समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन, वाईट चालीरितीला फाटा देऊन समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, एक आदर्श समाज निर्माण करण्यासाठी काशिनाथ नायक यांनी आपले आयुष्य वेचले. बंजारा समाजाची संस्कृती जतन करण्यासाठी आणि समाजात सेवालाल महाराज यांच्या सह छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहु महाराज, भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात पेरण्याचे मोठे काम त्यांनी केले होते.
काशिनाथ नायक यांच्या निधनामुळे देशातील बंजारा समाज पोरका झाला असून समाज एका बुद्धीजीवी नेत्याला मुकला आहे अशा भावना सेवालाल सेना संस्थापक अध्यक्ष बी एम पवार यांनी व्यक्त केल्या आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा