गोंधळी नाभिक समाज बँडबाजावाले यासह गावठी कलाकारांना सरकार आधार कधी देणार.-दत्ता वाकसे
बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे
महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये सध्या पाहिले तर खूप मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे परंतु सध्या परिस्थिती पाहिली तर ज्यांचे हातावर पोट आहे अशा समाजाला म्हणजे नाभिक समाज मंगल कार्यालयवाले बँड बाजावाले गोंधळी समाज आणि गावठी कलाकारांना खूप मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करावा लागत आहे तशी परिस्थिती पाहिली तर राजकीय पक्ष सत्ताधारी असो की विरोधक मात्र रोज गर्दी जमवून शासन नियमाला तितांजली देत आहेत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे या निवडणुकीत मात्र खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जमवून शासनने नियमाला पायदळी तुडवली जात आहे परंतु इकडे जनसामान्यांसाठी मात्र वेगळा न्याय सत्ताधारी विरोधक मात्र स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी गर्दी जमवून शासन नियमाचे धिंडवडे उडवत आहेत मात्र इकडे गावठी कलाकार गोंधळी बँडवाले नाभिक समाज यांना मात्र अक्षरशः रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे मात्र शासन यांच्याकडे कानाडोळा करताना दिसत आहे मग यांना आधार कोण देणार सरकार कधी आधार देणार..?असा सवाल करत धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे पुढे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात ते म्हणाले की आज परिस्थिती पाहिली तर खूप अवघड झालेली आहे कोरोनाची परिस्थिती गंभीर निर्माण होताना दिसत आहे परंतु याकडे मात्रे सरकार माय बाप साफ दुर्लक्ष करताना दिसत आहे आज पाहिले तर नाभिक समाज गोंधळी समाज यासह गावठी कलाकार यांना मात्र अक्षर च्या उपासमारीची वेळ आलेली आहे परंतु शासन स्तरावर कुठल्याही प्रकारचे नियोजन या भटकंती करणाऱ्या व हातावर पोट असणाऱ्या समाजाला न्याय मिळवून देणारा आहे यांना रोज कमवले तरच खायला मिळते अशी परिस्थिती असणाऱ्या समाजाला मात्र शासनाकडून अन्यायची वागणूक मिळत आहे त्यामुळे तात्काळ नाभिक समाज गोंधळी समाज मंगल कार्यालय बँडबाजावाले यांना सरकारने त्यांची उपजीविका भागवण्यासाठी नियोजित नियोजन करणे गरजेचे आहे परंतु आज परिस्थिती पाहिली तर खूप हलाखीची होताना दिसत आहे त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होताना दिसत आहे त्यामुळे यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवणार कोण.? सरकारला यांच्या उपजीविकेचे काही देणेघेणे नाही काय असाच प्रश्न निर्माण होत आहे स्वतःचे जीवन हे रोज कष्ट केले तरच त्यांना रात्रीच जेवण मिळतं अशी परिस्थिती असणाऱ्या गोंधळी समाज नाभिक समाज बँडबाजावाले यांना मात्र सरकारकडून अन्यायाची वागणूक मिळत आहे त्यामुळे तात्काळ यांच्या रोजच्या जनजीवनाचा प्रश्न सोडवला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय याठिकाणी भीक मागो आंदोलन करणार आहे असे देखील दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात मध्ये वाकसे यांनी म्हटले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा