Breaking

रविवार, ४ एप्रिल, २०२१

पंढरपूर पोट निवडणुकीचा प्रचार रात्री सात नंतर बंद ठेवा**. *****************************************निवडणूक आयोगांकडे बशीर जहागीरदार यांची तक्रार**. ********************************************





*पंढरपूर पोट निवडणुकीचा प्रचार रात्री सात नंतर बंद ठेवा*
*************************
*निवडणूक आयोगांकडे बशीर जहागीरदार यांची तक्रार*
******************************
टेंभुर्णी प्रतिनिधी अमोल भोसले


 : कोरोनाचे वाढते प्रादुर्भव लक्षात घेता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी रात्रीची संचारबंदी संध्याकाळी सात ते सकाळी सात पर्यंत संपुर्ण महाराष्ट्रभर जाहिर केली आहे.जिल्हाधिकारी सोलापुर यांनी गेल्या आठवडा भरापासुन शनिवार व रविवारी ग्रामीण भागात लॉगडाऊन ठेवले आहे.याची कठोर अंमलबजावनी करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला जिल्हाधिकारी यांनी दिले आहे,परंतू पंढरपूर पोट निवडणूकीसाठी मात्र हेच नियम शिथिल करण्याचे आदेश प्रशासनाने दिले असल्याने या बाबत सामाजिक कार्यकर्ते बशीर जहागीरदार यांनी पंढरपूर  पोट निवडनुणुकीला देखील शासनाचे संचारबंदीचे आदेश लागू करुन संध्याकाळी प्रचार सभा,कॉर्नर बैठका,पद यात्रा यांना देखील बंदी घालावी अशी मागणी महाराष्ट्राचे निवडणूक आयोग यांचेकडे केली आहे.
       कोरोना एवढा पसरला आहे,शासनाला जनतेची इतकी काळजी आहे,तर पोट निवडणुकीची इतकी घाई गडबड करण्याची गरज नहव्ती निवडणूक आयोगांनी देखील याचा विचार करणे गरजेचे होते.पोट निवडणुक नाही घेतली तर कुणाचे एवढे नुकसान होणार नसल्याने निवडणुक अश्या वेळेस जाहिर करणेची गरज नसल्याचे जहागीरदार यांनी म्हटले आहे.निवडणूक जाहिरच केली आहे तर रात्रीचा संचारबंदी कायदा व सोशल डिस्टन्सींग व ईतर नियम प्रचारयंत्रणेत देखील लागू होण्याची गरज आहे व त्या नियमांची कठोर अंमलबजावनी देखील होणे महत्वाचे असल्याचे म्हटले आहे.पदयात्रेत,जाहिर सभेत गर्दी होणार या मुळे कोरोना बाबतीत सरकार काय उपाययोजना करणार.
      दुकान बंद करण्यास उशीर झाला,ट्रिपल सीट मोटर सायकल चालवली,मास्क न लावल्यास पोलिस दंड आकारतात.रात्री संचारबंदी असताना चार पाच लोकं बाहेर पडल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करतात.या सर्व बाबींची कठोर अंमलबजावनी निवडणुकी दरम्यान देखील करने जरूरीचे आहे.प्रचार सभेतील गर्दी,जाहिर सभेचे दिलेले नियम,कॉर्नर बैठकांची नियमावलीचे निर्बंध या सर्वांबाबतीतले नियम पाळले गेले पाहिजे.सर्व नियम जनसामान्य लोकांनीच पाळायला पाहिजे असे नाही ते नियम निवडणुकीत देखील पाळले पाहिजे असे निवेदनात म्हटले आहे.
       सात ते सात संचारबंदी सर्वांसाठी ठेवणार असेल तर ती पोट निवडणुकीसाठी देखील आमलात आणायला पाहिजे.निवडणुकीत लोकांना एक न्याय आणि सामान्य जनतेला एक न्याय असे भेदभाव न करता पोट निवडणुकीचे प्रचाराला देखील सात ते सात संचार बंदी सक्तीची करा.संध्याकाळी सात नंतर प्रचार बंद ठेवा,नाही तर सर्वांसाठी ही संचारबंदी उठवा अशी मागणी निवडणूक आयोग यांचेकडे केली असुन त्याची प्रत राज्यपाल, मुख्यमंत्री,मुख्यसचिव,विभागीय आयुक्त पुणे,जिल्हाधिकारी सालापूर,उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग,तालुका पोलिस स्टेशन पंढरपूर व शहर पोलिस स्टेशन पंढरपूर यांना पाठविण्यात आले आहे.

******************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा