*कोरोनाची कल्पना बिल गेट्सची, सरकार जनतेची फसवणूक करत आहे - ह.भ.प.बंडातात्या कराडकर*
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
गेले वर्षभर कोरोनाचा खेळ खेळणारे सरकार आता कोरोना लस घेण्यासाठी परत एकदा कोरोनाची लाट आल्याचे नाटक करून भारतीयांची फसवणूक करून लुटत आहेत. कोरोनाची कल्पना बिल गेट्सच्या डोक्यातून निर्माण झाली असून भारतासह अनेक देश बिल गेट्सची खेळणी आहेत. जगातील अनेक तज्ञ ओरडून सांगत आहेत. तरीही लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा धंदा चालू आहे. त्यामुळे पुन्हा व्हायरस नसून दहशत आहे असे मत ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
बंडातात्या कराडकर यांनी म्हटले आहे की, भारतात प्रती वर्षी कॅन्सरनी मरणाऱ्या रुग्णांची संख्या सरकारी माहितीनुसार साडेसात ते आठ लाख आहे. दारु पिऊन मरणाऱ्यांची संख्या अडीच लाख आहे. असे असताना बनावट कोरोनाने मारणाऱ्या रुग्णांची संख्या वाढवून सांगितली जाते. तंबाखु व तंबाखुजन्य तसेच अन्य मादक पदार्थाचे उत्पादन, विक्री व सेवनावर कोणतेही बंधन नाही. यावरून सरकार दांभिक आहे हे सिद्ध होते.
कोरोनाला नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोनाची लक्षणे ताप, थंडी, सर्दी, कफ, खोकला असे सामान्य लक्षणे असून तो जीवघेणा रोग नाही. ( मुळात कोरोनाच नाही ) या वर आयुर्वेदात शेकडो उपाय आहेत. पण सरकार हे उपायांना प्राधान्य देत नाही. कारण ही औषधे बिल गेट्सची नाहीत. सरकारला नागरिकांना लुटून बिल गेट्सची सेवा करायची आहे. म्हणून लॉकडाऊनचे नाटक चालू आहे. यातून जनतेचा उद्रेक झाला तर ती क्रांती असेल व झाला नाही तर दुसऱ्या पारतंत्राची नांदी असेल, असे बंडातात्या कराडकर यांनी म्हटले आहे. माझे हे वैयक्तीक परखड मत असून यास कुठलाही सांप्रदाय व संघटना जबाबदार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा