Breaking

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

पुसेसावळी अट्रोसिटी प्रकरणाची सत्य बाजू उजेडात येणे आवश्यक - मराठा समन्वयक बाबा शिंदे* सत्य की राजकीय षडयंत्र



*पुसेसावळी अट्रोसिटी प्रकरणाची सत्य बाजू उजेडात येणे आवश्यक - मराठा समन्वयक बाबा शिंदे*
 सत्य की राजकीय षडयंत्र 
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
      
            फेब्रुवारी मध्ये घडलेल्या पोक्सो व अट्रोसिटी प्रकरणातील संशयित अटकेत असताना जवळपास दोन महिन्यानंतर एका प्रतिष्ठित नेतृत्वावर गुन्हा दाखल केला जातो.
          या प्रकरणात दलित समाज्यातील अल्पवयीन मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी इतर समाज्यातील काहीजण धडपड करत असल्याचे समजते, परंतु दलित समाज्यातील तालुका पातळीवरील व जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी पीडित मुलीच्या घरी भेट देऊन माहिती घेतल्याचे समजते तसेच यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा संशय त्यांना आल्याने त्यांनी निर्दोष लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत असे डीवायएसपी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
            खरं तर बऱ्याच कसेस मध्ये पोलिस प्रशासन गावातील प्रतिष्ठित लोकांबरोबर समन्वयक साधून तंटामुक्ती, पोलीस पाटील अथवा ग्रामपंचायत द्वारे गावातील सामाजिक सलोखा राहण्यासाठी पोलीस केसेस सामंजस्याने मिटवण्यात यशस्वी होत असते. सदरील प्रकरणात स्थानिक नेत्यांचा उद्देश प्रामाणिक आहे की नाही हे तपासणे आवश्यक वाटते आणि अश्या प्रकारे गुन्हा दाखल होत असेल तर इथून पुढं कोणत्याही गावातील राजकीय नेतृत्व अश्या केसेस मिटवण्यासाठी पुढाकार घेणार नाहीत. जर त्या मुलीच्या बाबतीत चुकीचे काही घडले असेल तर तिला न्याय मिळणं आवश्यकच आहे. परंतु यामागे जर काही राजकीय नेते पूर्ववैमनस्यातून हे प्रकरण जाणीवपूर्वक चिघवळण्याचा प्रयत्न करत असतील तर याचाही तपास करणे गरजेचे असल्याचे दिसून येते.
           भारतीय कायद्यात पीडित व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे याचबरोबर शंभर अपराधी सुटले तरी चालतील परंतु एका निरपराध व्यक्तीला चुकीच्या अथवा खोट्या गुन्ह्यात शिक्षा मिळू नये असे सांगितले आहे. या प्रकरणी आम्ही स्वतः जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सलसाहेब, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील साहेब, डीवायएसपी डॉ. निलेश देशमुखसाहेब व एपीआय भापकरसाहेब यांचेशी संपर्क साधून योग्य तपास करूनच पुढील कारवाई करण्यात यावी अशी विनंती केली आहे. कोणावरही अन्याय होऊ नये हीच एक प्रामाणिक भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मांडली असेलचे मत मराठा क्रांती मोर्चाचे सातारा समन्वयक बाबा शिंदे यांनी केले आहे.
      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा