Breaking

मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

महिलांनी स्वावलंबी बनून स्वतःच्या पायावर उभे राहावे - माई सावर्डेकर**येरळा परिवाराने केलेला सन्मान ऊर्जा देईल*

महिलांनी स्वावलंबी बनून स्वतःच्या पायावर उभे राहावे - माई सावर्डेकर*
*येरळा परिवाराने केलेला सन्मान ऊर्जा देईल*

वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

       महिलांनी स्वावलंबी बनून स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे. त्या आपल्या बचत गटाच्या माध्यमातून सदैव महिलांच्या उन्नतीसाठी कार्यक्षम आहेत. महिलांनी स्वावलंबी व्हावे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो. असे मत आखिल भारतीय महाक्रांती सेना राष्ट्रीय महिला आघाडीच्या अध्यक्षा जयश्री सावर्डेकर ( माई ) यांनी वडूज येथे केले. तसेच सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या, येरळा परिवारांने केलेला सत्कार हा पुढील वाटचालीस ऊर्जा देणारा ठरेल. 
       येरळा परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या विविध मान्यवरांच्या सत्कारात खटाव तालुक्याच्या पाहणी दौऱ्यावर आलेल्या जयश्री सावर्डेकर ( माई ) यांचा सत्कार खटाव पंचायत समितीच्या सदस्या मेघाताई पुकळे यांच्या हस्ते, निमसोड गावचे सुपुत्र, युवा उद्योजक श्रीकांत देवकर यांची रासप युवकच्या जिल्हाधक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदिप मांडवे यांच्या हस्ते तर वडूजच्या शारदा भस्मे यांची महाक्रांती सेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झालेबददल तर नवनिर्वाचित निढळच्या सरपंच बायडाबाई ठोंबरे, गोसाव्याचीवाडीचे सरपंच गजानन कुऱ्हाडे, उपसरपंच देविदास फडतरे यांचा व इतर मान्यवर पदाधिकाऱ्यांचा सत्कार येरळा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष धनंजय क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला.  
           बेलापूर ( नवी मुंबई ) स्थित्य वास्तव्यास असलेल्या जयश्री सावर्डेकर ( माई ) यांनी आतापर्यत आपल्या जीवनात सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, अनाथ -अपंग, निराधार पुरुष - महिला, युवक -युवती व महिला बचत गटातील महिलांना येणाऱ्या अडीअडचणीच्या काळात महिलांना मदत करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. याबददल शासनाच्या वतीने व विविध संस्थाच्या वतीने त्यांना आंतरराष्ट्रीय २४ पुरस्कार, राष्ट्रीय २६ पुरस्कार, राज्यस्तरीय ४३४ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. कोविड योध्दा म्हणून त्यांना आता पर्यत १५३ सन्मापत्राने विविध संस्थांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
        यावेळी युवा उद्योजक जीवनशेठ पुकळे, सरपंच अॅड. रोहन जाधव, लालासो माने - पाटील, सोमनाथ साठे, रणजीत फडतरे, धनाजी चव्हाण, केतन गोडसे, अधिक जगदाळे, संतोष पाटोळे, सचिन साठे, संदिप फडतरे, रामभाऊ निंबाळकर आदि सह येरळा परिवार सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद कदम यांनी केले तर समीर तांबोळी यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा