*गुडीपाडव्याच्या गुळ व कडुलिंबाचे सेवन आरोग्यास लाभदायक*
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
गुडीपाडवा सण म्हणजे मराठी नूतन वर्षाचा प्रारंभ. गुडी पाडवा, अक्षय तृतीया, विजयादशमी, दिवाळी सणातील पाडवा हे साडेतीन मुहूर्त अत्यंत महत्वाचे मानले जातात. या दिवशी शुभकार्य पार पाडली जातात. सण साजरे करण्यामागील धार्मिक, पारपांरिक महत्त्वाशिवाय नैसर्गिक व आपल्या आरोग्याशी संबंधीत ही अनेक गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत.
गुडीपाडव्याच्या दिवशी कडूलिंबाची कोवळी पाने आणि गुळाचे सेवन करण्याला विशेष महत्त्व आहे. याच दिवशी कडूलिंबासह अन्य पदार्थ एकत्रीत करून प्रसाद तयार केला जातो. उन्हाळा बाधू नये तसेच आरोग्य निरोगी राहावे यासाठी कडूलिंबाची पाने व गुळ खाण्याचा सल्ला आपल्याला थोरामोठ्याकडून दिला जातो. पित्त, भूक न लागणे, पोटदुखी, त्वचा विकार, त्वचेवरील डाग, सांधे दुखी, तोंडाचे विकार या सह अन्य कित्येक आजारांवर कडूलिंबाचा पाला व गुळ रामबाण आयुर्वेदिक उपाय मानला जातो. तज्ञांच्या सल्ल्यानुसार आपण दैनंदिन स्वरूपातही कडूलिंबाची पाने व गुळाचे सेवन केल्यास कोणते आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.
हल्ली बहुतांश जण वजन घटविण्यासाठी महागडया स्वरूपातील औषधोपचार करतात. या ऐवजी आयुर्वेदिक उपचारांची मदत घेतल्यास कित्येक आरोग्यदायी लाभ मिळतील. यापैकीच एक उपाय म्हणजे कडूलिंब. तज्ज्ञांच्या सल्यानुसार कडूलिंबाच्या पानांचे सेवन केले तर शरीराचे वाढलेले वजन नियंत्रणात येण्यास मदत मिळते. शरीर डिटॉक्स करण्यासाठीचा हा रामबाण उपाय आहे. या कडूलिंबाच्या पानांच्या सेवनामुळे पोटाशी संबधीत समस्याही दूर होतात. तसेच शरीरातील विषारी व हानिकारक घटक सहजरित्या शरीराबाहेर फेकले जातात. यामुळे पचन प्रक्रिया व चयापचयाची क्षमता मजबूत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा