Breaking

मंगळवार, २५ मे, २०२१

सोलापूर जिल्ह्याला लस देण्यात विभागीय स्तरावरून अन्याय का ? रयत क्रांतीचे प्रा.सुहास पाटील यांचा सवाल.. केली आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार...



*सोलापूर जिल्ह्याला लस देण्यात विभागीय स्तरावरून अन्याय का ? रयत क्रांतीचे प्रा.सुहास पाटील यांचा सवाल.. केली आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार...*



 टेंभुर्णी प्रतिनिधी/

सोलापूर जिल्ह्यावर विभागीय स्तरावरून कोवीड लसीबाबतचा होत असलेला अन्याय दूर करावा.रयत क्रांतीचे प्रा सुहास पाटील.रयत क्रांती संघटनेने आरोग्य मत्र्यांकडे केली तक्रार. भिमानगर(प्रतिनीधी)- सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीने थैमान घातले आहे. सोलापूर जिल्ह्याला कोवीड लसींचा पुरवठा संदर्भात अन्याय झाल्याचे सांगत लोकसंख्येच्या प्रमाणात लस पुरवठा करावा असे रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा सुहास पाटील  यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचेकडे ई मेल द्वारे मागणी केली आहे.पुणे विभागातुन खुप कमी प्रमाणात लस पुरवठा झाला आहे.लोकसंख्येंच्या प्रमाणात लस मिळणे आवश्यक असताना फक्त ११.४१% लोकांचे लसीकरण झाले आहे.पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांच्या मृत्युदरांपैकी सर्वात जास्त मृत्यू दर सोलापूर जिल्ह्यात आहे.आतापर्यंत ३७२० लोकांचा कोरोनाने मृत्यृ झाला आहे. विभागातील जिल्ह्यांच्या  लोकसंख्येच्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या ४३.२ लाख असून आतापर्यंत फक्त ४.९३ लाख लोकांनाच लस मिळालेली आहे. पुणे विभागातील जिल्ह्यांच्या टक्केवारी पैकी ११.४१% टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे.ईतर जिल्ह्यांच्या तुलनेने सोलापूर जिल्ह्यात खूप कमी लसीकरण झाले आहे.त्यामुळे कोवीड लस मिळण्यासाठी सोलापूर जिल्ह्यावर होत असलेला अन्याय आपण दूर करावा,असे आवाहन रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा सुहास पाटील यांनी केले आहे.राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मेलवरून निवेदन पाठवले आहे. सद्यस्थितीत कोरोना रूग्णांचे ग्रामीण भागात प्रचंड प्रमाण वाढले असुन याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.यासंबधी प्रा पाटील यांनी निवेदनात पुढील मागण्या केलेल्या आहेत.सरकारी मृत्युदराचे प्रमाण व प्रत्यक्ष कोरोना रुग्ण मृत्यूचे प्रमाण या आकडेवारीमध्ये प्रचंड तफावत आहे. आपण प्रत्येक ग्रामपंचायतींना स्पष्ट आदेश देऊन ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण मृत्यूंची संख्या व त्यांचा सर्व्हे करण्यात यावा. कोरोना लसीकरण प्रत्येक गावोगावी शिबिरे लावून करण्यात यावी. ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक,अंध व्यक्ती,अपंग व्यक्ती, गोर गरीब कुटुंबे यांना लसीकरण केंद्रावर येण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीने करावी.ग्रामीण भागात कोरोना चाचण्या व ट्रेसिंग रुग्ण तपासणे करणे खूप गरजेचे आहे. अन्यथा ग्रामीण भागामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढल्याशिवाय राहणार नाही. अद्यापही ग्रामीण भागात लॉकडाउन नियमांचे पालन होत नसल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून कोरोना नियमांचे पालन करणेबाबत स्पष्ट आदेश व्हावेत. गावामध्ये दवंडी देऊन,त्याचा प्रसार व प्रचार वाड्या-वस्त्या पर्यंत करावा.कोरोना रुग्णांचे ज्या दवाखान्यात उपचार घेतले जातात.अशा रुग्णांना त्यांचे खर्चाच्या पावत्या मिळाव्यात,म्हणजे त्यांना विमा संरक्षण व शासनाच्या ईतर मदतीपासून वंचित राहणार नाहीत. बहुतांश दवाखान्यात रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेला खर्च व त्याची बिले यामध्ये तफावत आढळून येत आहे,हा एक प्रकारे लोकांवर अन्याय होत आहे. कोरोना वॉरियर्स म्हणून काम करीत असलेले,प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स, ग्रामसेवक,तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामपंचायत शिपाई यांना शासनाने विमा संरक्षण द्यावे,अशा मागण्या रयत क्रांती संघटनेच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना ई-मेल द्वारे करण्यात आलेल्या आहेत.या मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर व्हावी,असे आवाहन रयत क्रांतीचे जिल्हा संपर्क प्रमुख सुहास पाटील यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा