*सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उद्रेक भडकत असताना मुख्यमंत्री गप्प का - प्रभाकर भैय्या देशमुख*
टेंभुर्णी प्रतिनिधी
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी उजनी निर्मीती करताना सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बारमाही पाणी देण्याची तरतूद केली होती.परंतु बारामतीकरांनी हे पाणी आठमाही नाही तर सहामाही वर आणले ते करुनही भागले नाही की काय म्हणून उजनी धरणातील सांडपाण्याच्या नावाखाली 5TMC पाणी इंदापूरला पर्यायाने बारामतीला नेण्याचा घाट घातला आहे असाच बारामतीकरांनी सोलापूर जिल्ह्याचा छळ सुरु केला आहे असेही देशमुख म्हणाले.
या निर्णयास संबध सोलापूर जिल्ह्यात विरोध होत असून संपुर्ण जिल्ह्यातील शेतकरी पेटून उठले असुन त्यावर कहर म्हणजे उपमुख्यमंत्री -जलसंपदामंत्री यांनी सातत्याने घुमजाव करून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भावना संतप्त करायचा प्रयत्न केला या सर्व प्रकरणात आजपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी एक चकार शब्दही काढला नाही यावरून हजारो शेतकऱ्यांचे प्रपंच उध्वस्त झाले तरी चालेल परंतु सत्ता टिकली पाहीजे एवढाच उद्देश आहे का ?
*जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन बापु जगताप,प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे,रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.सुहास पाटील सर,विठ्ठल आबा मस्के,सचिन पराडे पाटील,रामदास खराडे, मल्हारी गवळी,प्रंशात महाडिक,धवल पाटील,मंगेश वाघ,दादासो गायकवाड, अतुल भालेराव, अंकुश महाडिक, नारायण गायकवाड,तानाजी गायकवाड, सचिन गायकवाड,सिध्दार्थ भास्कर,दत्ता आरकिले, विजयराजे खराडे,संजय नवले,श्रीराम महाडिक, सौरभ आरकिले,अमोल पाटील, अकोले बु!! चे सरपंच सतीश आबा सुर्वे, उपसरपंच बशीर मुलाणी, ग्रां.प.सदस्य कल्याण नवले,रमेश पवार,तुषार पाटील,सुजीत दरगुडे*
*संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ, जि.संघटक गणेश सव्वासे,करमाळा तालुकाध्यक्ष अमित घोगरे,सचिव गणेश डोके*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा