*जयंत पाटील यांचा उजनी धरण गेटवर पुतळा जाळून बोंबाबोंब आंदोलन केले*
टेंभुर्णी प्रतिनिधी
*सोलापूरकरांच्या हक्काच्या उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाणी इंदापूरला सोडण्याचा आदेश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रद्द केल्याचा व्हिडिओ प्रसारित केला मात्र आज तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून सहा दिवस झाले तरी याबाबत कुठलाच लेखी आदेश काढला नाही.या उलट शासनाने समिती नेमून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे ,व जलसंपदा मंत्री जयंत पाटील ,हे करत असल्याने आज जनहित संघटनेचे उजनी धरणाच्या गेटवर 14 दिवस आंदोलन करूनही कुठला ठोस निर्णय घेतला नसल्याने आज आम्ही जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने जयंत पाटील यांच्या पुतळ्याचे दहन करून बोंबाबोंब आंदोलन करीत असल्याचे जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले
उजनी धरणावर असलेल्या उजनी गेट जवळ जनहित शेतकरी संघटनेने गेल्या चौदा दिवसापासून आंदोलन सुरु असून आज संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या पुतळ्याचे डिझेल ओतून पेटून पुतळ्याच्या कडेने बोंबाबोंब आंदोलन करून येडे मारत असताना टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस एपीआय शितोळे साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यां वेळी पुतळा ताब्यात घेऊन विझवण्याचा प्रयत्न केला .
या वेळी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन बापु जगताप,प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे, जनहित संघटनेचे विठ्ठल आबा मस्के, सचिन पराडे -पाटील,रामदास खराडे, मल्हारी गवळी,प्रंशात महाडिक,धवल पाटील,मंगेश वाघ,दादासो गायकवाड, अतुल भालेराव,अंकुश महाडिक, नारायण गायकवाड,तानाजी गायकवाड, सचिन गायकवाड,गणेश उजगीरे,सिध्दार्थ भास्कर,दत्ता आरकिले, विजयराजे खराडे,संजय नवले,श्रीराम महाडिक, अधिक जण उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा