*आनंदी रहाण्यासाठी सकारात्मक विचार करावा, - प्राचार्य डॉ.एस.एम.मणेर*
तुळजापूर,दि.20,मे, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे आयटी एम स्कील अकादमी तर्फे आय सी आय सी आय बॅंकेकरिता अॉनलाईन मुलाखतीच्या प्रथम फेरीचे उद्घाटन नुकतेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या हस्ते संपन्न झाले.सदर मुलाखती या बी आर ओ तसेच सेल्स अॉफिसर या पदांसाठी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतून पदवी संपन्न केलेल्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आहेत.या अॉनलाईन मुलाखतींच्या उद्घाटना प्रसंगी प्राचार्य डॉ एस एम मणेर यांनी वरील प्रतिपादन केले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते म्हणाले की,कोरोना महामारीच्या काळामध्ये तरुणांमध्ये उदासीनता दिसून येत आहे,या प्रतिकूल परिस्थितीवर सकारात्मक विचाराने आपण मात करु शकतो,आपण नेहमी आनंदी रहाण्याचा प्रयत्न करावा,आपण जर कोरोना महामारीच्या नियमांचे तंतोतंत पालन केले तर आपणास कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही.महाविद्यालय शै.वर्ष 2014 पासुन कॅम्पस इंटरव्ह्यू हा उपक्रम यशस्वीपणे राबवित आहे, अनेक विद्यार्थ्यांना यातून रोजगार उपलब्ध झाले आहेत,संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात,तुमच्या संकटाचे संधी मध्ये रूपांतर करा-- गांधींजी ना दक्षिण अफ्रीके त रेल्वेतून बाहेर ढकलले नसते तर ते महात्मा झाले नसते . सिधुताई सपकाळ नां पति ने घरातून बाहेर काढले नसते तर आज त्या हजारो मुलांची माय झाल्या नसत्याआपण संकट हे नविन संधी म्हणून स्विकारणे काळाची गरज आहे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.यावेळी आयटीएम स्कील अकादमीचे व्यवस्थापक विवेक अजमाने,संग्राम देशमुख,श्रुती पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल प्रमुख प्रा.जी.व्ही बाविस्कर,प्रा.डॉ.मेजर वाय ए डोके,प्रा.व्ही.एच.चव्हाण यांची ही अॉनलाईन उपस्थिती होती.जून 2021 मध्ये तुळजाभवानी महाविद्यालय हे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे.याही पुढे विद्यार्थी हित लक्षात घेऊनच महाविद्यालय आपले कार्य करीत रहणार आहे अशी प्रतिक्रिया शेवटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांनी व्यक्त केली.यावेळी तब्बल 80 पदवीधारकांनी अॉनलाईन मुलाखतीस उपस्थिती दर्शविली.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा