*उजनीचे पाणी रद्द केल्याच्या* *निषेधार्थ ,बावडा येथे* *शेतकऱ्यांचा रास्ता रोको*
इंदापूरप्रतिनिधी/शशिकांत सोनटक्के
राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रयत्नांमुळे इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी पुणे
व पिंपरी-चिंचवड शहरातील उजनी जलाशयामध्ये येणारे ५
टीएमसी सांडपाणी नुकतेच मंजूर
करण्यात आले होते,
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते, परंतु अनपेक्षितपणे २दिवसां पूर्वी
हा निर्णय रद्द करण्यात आला होता,यांचे तीव्र पडसाद आज बाबडा गावामध्ये उमटले.बावडा परिसरातील असंख्य शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या निर्णयाचा निषेध व्यक्त केला,
यावेळी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयबापू घोगरे, जेष्ठ नेते दत्तात्रय घोगरे,जलतज्ञ बाळासाहेब करगळ, अजितदादा टिळेकर, तुकाराम घोगरे, शिंदे सर, रविराज घोगरे, संतोष घोगरे,पिंपरीचे सरपंच श्रीकांत बोडके, नवनाथ रूपनवर, दत्तात्रय घोगरे, विजयबापू गायकवाड,चाकाटीचे सरपंच संजय रूपनवर भांडगाव चे सरपंच पांडुरंग जाधव, सुभाष गायकवाड,लुमेवाडीचे मा.सरंपच शब्बीर काझी,नरसिंहपूरचे उपसरपंच विठ्ठल देशमुख, बांधकाम व्यावसायिक नंदकुमार गायकवाड, नागेश गायकवाड,दिपक अरगडे , शितल कांबळे, जिग्नेश कांबळे, हनुमंत गायकवाड, प्रधान आगलावे, विक्रांत घोगरे, किशोर शिंदे, उमेश शिंदे, विश्वजीत घोगरे, संजय माने, महावीर भिसे, संजय मोरे, पांडुरंग कांबळे, यांच्यासह
शेकडो शेतकरी बांधवांनी एकत्र येत रास्ता रोको करून आंदोलन केले,
या प्रसंगी विजयबापू घोगरे , विजय गायकवाड, दत्तात्रय घोगरे,
व हनुमंत कोकाटे-पाटील यांनी तीव्र शब्दांत पाणी वाटपाचा
निर्णय रद्द केल्यामुळे नाराजी व्यक्त केली,
वाटपावरून अनावश्यक राजकारण करणा-या सोलापूर जिल्ह्यातील सर्वच पुढायांचा जाहीर पणे निषेध करून पुढील काळात हक्काच्या पाण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील मंडळींनी अकलूजच्या पुढे येऊ देणार नसल्याचा इशारा दिला, तसेच उजनीतील इंदापूरच्या हक्काचे पाणी मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही उपस्थित सर्वच शेतकऱ्यांचा
वतीने देण्यात आली,
तसेच यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.शेवटी प्रशासकीय अधिकाऱ्यांना निषेधाचे निवेदन देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा