*शासनाने उजनी धरणाचे बारमाही पाणी दिलेच पाहीजे-प्रभाकर भैय्या देशमुख*
*तिघांची गठीत समिती म्हणजे निव्वळ धुळफेक असल्यामुळे १२ व्या दिवशी आंदोलन सुरुच*
सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाची निर्मिती ४५ वर्षापुर्वी झाली.स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी उजनी धरणातील पाणी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बारमाही पाणी देण्याची तरतूद केली होती त्या धोरणाला लोकप्रतिनिधींकडून छेद देण्यातुन येतो ही बाब निंदणीय आहे.
राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जाहीरपणे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शब्द दिला होता तो अद्याप पाळला नाही त्यामुळे आंदोलन अजुन सुरुच आहे हा जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे.अन् त्यांच्याच शासन दरबारातून दैनिकात माहिती मिळाली कि उपसचिवांच्या सहीने तीन सदस्यीय समिती स्थापन केली म्हणजे एकीकडे जयंत पाटील उजनीचे पाणी उचलणार नाही असे म्हणतात तर दुसरीकडे समिती नेमली जाते ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये ताळमेळ दिसत नाही असेही देशमुख म्हणाले
*जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन बापु जगताप,प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.सुहास पाटील सर,विठ्ठल आबा मस्के,सचिन पराडे पाटील,रामदास खराडे,मल्हारी गवळी,प्रंशात महाडिक,धवल पाटील,मंगेश वाघ,दादासो गायकवाड,अतुल भालेराव, अंकुश महाडिक, नारायण गायकवाड,तानाजी गायकवाड, सचिन गायकवाड,गणेश उजगीरे,सिध्दार्थ भास्कर,दत्ता आरकिले,विजयराजे खराडे,संजय नवले,श्रीराम महाडिक,अकोले बु!! ग्रा.पं.सरपंच पवार,सतीश सुर्वे,तुषार पाटील,चंद्रकांत थोरात,यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते*.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा