Breaking

शुक्रवार, २८ मे, २०२१

खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ.जयकुमार गोरे यांनी वाचवला अपघातग्रस्त महिलांचा जीव.


खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ.जयकुमार गोरे यांनी वाचवला अपघातग्रस्त महिलांचा जीव.
फलटण तालुका प्रतिनिधी/शरिफ काझी

लोणंद-शिरवळ रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये दोन महिला जखमी झाल्या होत्या. त्याचवेळी खा.रणजितसिंह ना.निंबाळकर व आ. जयकुमार गोरे हे तेथून निघाले होते.या दोघांनीही आपल्या गाड्या थांबवून त्या अपघातग्रस्त महिलांना वेळेवर दवाखान्यात उपचारार्थ नेवून त्यांचे जीव वाचवले.
याबाबत अधिक माहिती अशी, आज लोणंद-शिरवळ रस्त्याने खंडाळामार्गे माढा मतदारसंघाचे खा.रणजितसिंह ना.निंबाळकर व आ.जयकुमार गोरे आपल्या सहकार्‍यांसमवेत सातारा येथे निघाले होते. त्यावेळी एकेठिकाणी त्यांना बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे निदर्शनास आल्यावर माढा मतदार संघाचे खा.रणजितसिंह ना.निंबाळकर व माण-खटावचे आ.जयकुमार गोरे यांनी तत्काळ आपले वाहन बाजूला घेतले.गाडीतून खाली उतरुन त्यांनी पाहिले असता लोणंद-शिरवळ मार्गावर दोन महिलांचा अपघात होऊन त्या भगिनी मोठ्या प्रमाणात जखमी झाल्या होत्या. यावेळी सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनीही कोणतीही वाट न पाहता त्या भगिनींना पाणी दिले व खासदारांनी स्वत:च्या वाहनाने त्या जखमी भगिनींना शिरवळ येथील डॉ.जोगळेकर यांच्या दवाखान्यात नेण्याची व्यवस्था केली. खासदारांच्या या तत्परतेने त्या जखमींचा जीव वाचला.
अपघात झाला की,पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून कोणी मदतीला जात नाही.परंतू आज खासदार व आमदारांनी अपघातग्रस्त महिलांना मानवतेच्या नात्यातून आपले सहकारी भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, अभिजित ना.निंबाळकर, भटक्या विमुक्त जमाती सेलचे अध्यक्ष सुनिल जाधव, मनोज कांबळे, राजेश शिंदे यांच्या सहकार्याने मोलाची मदत केली व त्या अपघातग्रस्त महिलांना दवाखान्यात पाठविण्यात आले त्यामुळे उपस्थितांमध्ये या सर्वांच्या रुपाने देवदूतच धावून आल्याची भावना निर्माण झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा