*मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी अभ्यास करून निर्णय घ्यायला हवा होता प्रभाकर भैया देशमुख.*
*शासनाच्या बेजबाबदारपणाचा काळ्या फीती व काळे मास्क लावून निषेध केला.*
भिमानगर प्रतिनिधी /धनंजय भोसले
भिमानगर येथे उजनी धरणावरती महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेले धरणे आंदोलनाचा आज 7 व दिवस आहे पालकमंत्री जिल्हाधिकारी यांनी दखल न घेतल्यामुळे आंदोलनस्थळी काळ्या फिती व काळे मास्क लावून निषेध व्यक्त केला यावेळी बोलताना प्रभाकर देशमुख म्हणाले मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी धरणातील पाण्याचा अभ्यास करून इंदापूर ला जाणाऱ्या 5 टीएमसी पाण्याला मंजुरी न देयला पाहिजे होती. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेला त्याची किंमत मोजावी लागेल. शिवसेनेबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरलेले आहे त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जलसंपदा सचिवा बरोबर तातडीची बैठक लावून खरी माहिती घेऊन मंजूर केलेले 5 टीएमसी पाणी त्वरित रद्द करून जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनस्थळी लेखी पत्र देऊन कळवावे. अन्यथा आंदोलन सुरूच राहील. आंदोलनाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली आहे. वेळ आली तर अधिकाऱ्यांच्या अंगावरील कपडे फाडून त्यांची धिंड काढण्यात येईल असा खणखणीत इशारा देशमुख यांनी बोलताना दिला आहे आमदारांनी पेपर बाजी न करता रस्त्यावर उतरावे.
तसेच यावेळी रयत क्रांती चे प्रा. सुहास पाटील बोलताना म्हणाले 5 टीएमसी सांडपाणी उजनी धरणात येतच नाही तरीपण बेकायदेशीररित्या मंजुरी दिली कशी याचे उत्तर शासनाने आंदोलनकर्त्यांना दिले पाहिजे अन्यथा भविष्यात हे आंदोलन उग्र स्वरूप धारण करेल यावेळी निषेध सभेत बळीराज्याचे माऊली जवळेकर किसन युवा क्रांतीचे प्रतापसिंह चंदनकर व प्रहारचे दत्ताभाऊ व्यवहारे यांनी जाहीर निषेध व्यक्त करून शासनावर नाराजी व्यक्त केली. यावेळी जनहित युवक जिल्हाध्यक्ष नाना मोरे, विठ्ठल मस्के ,रांजणीचे नारायण गायकवाड ,विलास जाधव, आप्पासाहेब यादव, करकंबचे विकास देशमुख, दत्ता वसेकर ,अंकुश माहाडिक ,सुस्त्याचे महेश चव्हाण, फुलचिंचोली चे बाळासाहेब पाटील दादा गायकवाड, मल्हारी गवळी, तानाजी गायकवाड ,अतुल भालेराव, मंगेश वाघ ,धवल पाटील, सचिन गायकवाड ,उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा