महिलांना सरपंचपदासोबत अधिकार मिळाले,पण गावातील इतर हस्तक्षेपांचं काय?
*भालचंद्र जोरवर यांनी दिले निवेदन*
टेंभुर्णी प्रतिनिधी :- नुकत्याच राज्यात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला आरक्षणातून ग्रामपंचायत मध्ये ५० टक्के महिलांचीही दमदार एन्ट्री झाली. अनेक गावांमध्ये महिला सरपंचांचीही नियुक्ती झालीय.आहेरगांव भुईजे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये महिला सदस्यांच्या ऐवजी त्यांचे नातेवाईक हस्तक्षेप करीत असल्याचे निवेदन आहेरगांव येथील रहिवासी भालचंद्र जोरवर यांनी ग्रामसेवक अनुजा बिनघे यांना १४ जून रोजी देण्यात आले .
मध्यंतरीच आहेरगांव भुईजे ग्रामपंचायतींची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक पार पडली.
त्यामध्ये ७ महिला, २ पुरुष असे सात सदस्य निवडून आले, “ग्रामपंचायतींच्या सभांना स्त्री सदस्यांची उपस्थिती अनिवार्य आहे . तरीही त्यांच्या शिवाय पुरुष बैठका आटोपून घेतात. एवढेच नव्हे तर त्यांच्यावतीने सह्या करतात. प्रमाणपत्रांवर हव्या असलेल्या आवश्यक सह्यासुद्धा पुरुष मंडळीच करून टाकतात. काही ठिकाणी बायकोची सही घेतली जाते. मात्र, तिला त्यात बोलायचा किंवा आपले मत मांडायचा अधिकार नसतो, हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी म्हणविणाऱ्या राज्यात घडते. काही ग्रामपंचायतींमधून स्त्रिया पुढाकार घेऊन कामे करीत आहेत. पुरुषांच्या वर्चस्वाला आव्हान देत आहेत. मात्र, अजूनही हे प्रमाण फारसे लक्षणीय नाही.” परंतु आपल्या गावातील महिला सदस्यांच्या ऐवजी त्यांचे नातेवाईक
प्रतिनिधी या गोंडस नावाखाली कारभारामध्ये हस्तक्षेप करीत असल्याचे दिसून येते. आपण महिला पदाधिकाऱ्यांच्या किंवा सदस्यांचे
नातेवाईक ग्रामपंचायतीच्या कारभारात मध्ये हस्तक्षेप करीत आहेत अशा सदस्य, पदाधिका-यांचवरती आपण महाराष्ट्र शासनाच्या २७जुलै २००७ च्या
शासन परिपत्रक क्रमांक झेडपीए १००५\५९४ मसु\परा१ अन्वये कारवाईसाठी आपल्या वरिष्ठांकडे अहवाल दयावा व शासनाने ज्या उद्देशाने
महिलांचा सहभाग राजकारणामध्ये वाढावा यासाठी जो ५० टक्के आरक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयाचा उद्देश सफल व्हावा एवढीच विनंती.
जर येत्या काळामध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पदाधिकारी किंवा सदस्यांच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप किंवा सदैव असणारा वावर बंद झाला नाही. तर आपले ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व या आंदोलनाच्या होणाऱ्या परिणामास सर्वस्वी आपण जबाबदार
असाल याचीही दखल घ्यावी ग्रामपंचायतीमधील हस्तक्षेप बंद झाला नाही तर याविषयी जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा