Breaking

बुधवार, २३ जून, २०२१

अंबड तालुक्यातील बनगाव येथे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्या हस्ते वृक्षारोपणपर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करण्याचे आवाहन


अंबड तालुक्यातील बनगाव येथे जिल्हाधिकारी                     रविंद्र बिनवडे यांच्या हस्ते वृक्षारोपण
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करण्याचे आवाहन

            जालना दि.20- पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन  विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून  जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्या हस्ते अंबड तालुक्यातील  बनगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले. बनगाव येथे  एक हजार वृक्षांची लागवड करून त्याचे संगोपन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात  वृक्षारोपणाचे नियोजन करण्यात आलेले असून तहसील कार्यालय, जालना यांच्यामार्फत दहिफळ मानेगाव शेवली येथे  पाच हजार झाडांचे वृक्षारोपण करण्याचे नियोजन, भोकरदन तालुक्यात तहसील कार्यालयामार्फत हसनाबाद खंडाळा खडकी याठिकाणी तीन हजार,   जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथे एक हजार वृक्षांची लागवड,  घनसावंगी  तालुक्यात मंगू जळगाव येथे एक हजार वृक्षांची लागवडीचे नियोजन असून  100 वृक्षांचे रोपनाने याचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. मंठा तालुक्यातील धोंडी पिंपळगाव, बदनापूर तालुक्यातील नजीक पांगरी व परतूर तालुक्यातील आंबा या ठिकाणी वृक्षारोपणाचे नियोजन करण्यात आलेले आहे. 

    सातत्याने वाढणाऱ्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून हे प्रदूषण रोखून  पर्यावरणाचा समतोल राखला जावा तसेच अधिकाधिक प्रमाणात प्राणवायूची निर्मिती होऊन पर्यावरणाचे संवर्धनासाठी जालना जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांसह सर्व शासकीय, निम शासकीय विभाग, विविध संस्था यांनी  मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून पर्यावरणाचे संवर्धन करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा