*शहरातील हद्धवाढ वाढ भागातील नागरिकांची समस्या कधी मिठनार, युवा सेने च्या वतीने निवेदन*
तुळजापूर : शहरातील शामाप्रसाद मुखर्जी हावर्सींग सोसायटी , हणुमान नगर येथील हद्धवाढ वाढ भागातील नागरिकांनची समस्या बाबद दि.२९ जुन रोजी युवा सेनेच्या वतीने मुख्याधिकारी /सचिन रोचकरी नगर परिषद तुळजापूर यांना दिले निवेदन
निवेदनात असे नमूद असे केले आहे कि, हदवाढ भागील नागरिकांची मोठया प्रमाणात हेळसांड होत आहे . शामाप्रसाद मुखर्जी हावर्सींग सोसायटी येथील हद्धवाढ वाढ भागातील हनुमान नगर परिसरात चोरांचा सुळसुळात, त्याच बरोबर रस्ते , गटारी , पिण्याचे पाणी, नळ योजना , लाईट त्याच बरोबर घाणीचे सामराज्य अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे . संध्याकाळी १ ते १ : ३० च्या दरम्यान धारधार शस्त्र घेऊन आज्ञात व्याती फिरताना दिसतात यामुळे परिसरातील नागरीकांचे भितीचे वातावरन पसरले आहे.
या हद्दीत अधिनियमात बांधकामे होऊन नागरिकांना नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे . तिर्थक्षेत्र तुळजापूर हे दिवसोन दिवस वाढत असून या भागात शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे . अनेक ठिकाणी रोहाऊसेस ओनरसिफ फॅल्याट उभारले जात आहेत त्याच बरोबर खुले फ्लोट विक्री होत असून यातील भहुतांश भाग शहराच्या हद्दवाढ क्षेत्रात आलेला आहे . नविन विकासक नियमागुसार संबधित जागा मालकांना एन ए ले आउंट मंजुरी पुर्वी संबधित जागेमध्ये नाली ,रस्ते , प्लेग्राउंड , विद्युत पोलची उभारणी करणे बंधन कारक आहे . विकासक या बाबी पुर्ण करतात परंतू याच्या अनुशंगाने अवश्यक असलेले पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विकसीत जागेतील सांडपाणी मुख्य ड्रेनेज लाईनला जोडणे इ . कामे नगर परिषदच्या अखत्यारीत येतात परंतू हद्दवाढ मंजूर होऊनही त्यांना संदर्भातील विकास कामाचा निधी शासनाकडून पालीकेश उपलब्ध झालेला नाही का ? या संदर्भात शासनाकडे संबधित हद्दवाढ भागाचा आराखडा तयार करून निधीसाठी प्रस्ताव पाठवीलेला आहे का ? संबधित निधी मंजुर होऊन रक्कम वर्ग झाल्यानंतर हद्द वाढ भागातील विकास कामे प्राधान्य क्रमाणे पुर्ण करण्यात यावी वाढीव निधीच्या उपलब्धतेसाठी तुळजापूर नगर परिषद सातत्यानी शासनाकडे पाठपुरावा करीत नाही का ?
झपाट्याने वाढत चाललेल्या शहराच्या नियोजन बध्द विकास होणे गरजेचे असून या संदर्भात सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक एकत्र यवून हद्दवाढ भागाचा प्रस्तावीत निधी खेचुन आण्याासाठी प्रयत्न करीत नाहीत ? मात्र नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर तरी हाद्द वाढ भागातील नागरिकांच्या समस्या सुटतील का ? नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर या मते मागण्यासाठी आम्ही आल्यास तुमची जागा दाखवून देवू या निवेदनावर प्रदिप इंगळे युवा सेना शहर कार्यध्यक्ष, तुळजापूर यांची स्वाक्षरी आहे. तरी वरीष्ठ अधिकाऱ्यानी लक्षदेव हद्दवाढ भागातील हेळसांड थांबवावी असा एका निवेदनाद्वारे इशारा दिला आहे या निवेदनावर
प्रदिप इंगळे युवा सेना शहर कार्यध्यक्ष, तुळजापूर यांच्या सह ३२ नागरीकांच्या स्वाक्षरी आहे.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा