Breaking

मंगळवार, ८ जून, २०२१

गंधोरा येथे शाळकरी मुलीला शॉक देऊन मारल्या ? प्रकरणी कारवाई करण्याची मागणी*गंधोरा येथे शाळकरी मुलीला शॉक देऊन मारल्या ? प्रकरणी कारवाई करण्याची मागणी*


*गंधोरा येथे शाळकरी मुलीला शॉक देऊन मारल्या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी*
उस्मानाबाद दि.७ (प्रतिनिधी) - तुळजापूर तालुक्यातील एका १२ वर्षीय अनाथ शाळकरी मुलीला विद्युत शॉक देऊन जीवे मारण्यात आले. या पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास आरोपी बरोबर संगणमत करून तो गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे याप्रकरणी संबंधितावर कारवाई करून न्याय देण्यात यावा, अशी मागणी नामदेव धर्मा राठोड यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथील प्रतिज्ञा अमोल पवार (वय वर्ष १२) या मुलीच्या आई-वडील यांचे १२ वर्षांपूर्वी निधन झाल्यामुळे आजोबा नामदेव धर्मा राठोड हे सांभाळ करत होते. दि.२१ मे रोजी सकाळी ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास शौचालयासाठी मोकळ्या पटांगणात गेली होती. शौचालयवरून वापस येताना सुधाकर राठोड व नामदेव राठोड या दोघांच्या अंदाजे दीड फुटाच्या बोळामधून प्रतिज्ञा घराकडे येत असताना सुधाकर राठोड यांनी पत्रे उडून जाऊ नयेत म्हणून घराला विद्युत महावितरण तारेच्या ओढण्या बांधल्या होत्या,बोलातून येत असताना प्रतिज्ञाच्या डाव्या हाताला म्हणजे सुधाकर राठोड यांच्या भिंतीला महावितरणच्या सोडलेल्या ओढणीला हात लागून प्रतिज्ञा हिला विद्युत शॉक लागून प्रतिज्ञाचा जाग्यावरच मृत्यू झाला. हा प्रकार जाणूनबुजून भावकीमधील वैर असताना जाणीवपूर्वक सुधाकर सुभाष राठोड, गणेश सुभाष राठोड, धोंडीराम सुभाष राठोड व छमाबाई सुभाष राठोड या सर्वांनी संगनमत करून नामदेव राठोड यांना ठार मारण्याचा कट रचला होता. परंतू त्या वेळेस प्रतिज्ञा शौचालयास गेल्यामुळे वरील चार लोकांनी प्रतिज्ञाला विद्युत करंट देऊन ठार मारले. हा प्रकार भावकीमधील पूर्ववैमनस्यातून असल्याचा कारणामुळे या हत्येचा कट रचला होता असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे, मला जर न्याय मिळाला नाही व माझ्या जीवाला काही बरे वाईट झाल्यास वरील चार लोकांबरोबर नळदुर्ग पोलिस स्टेशनचे पोलिस जबाबदार राहतील असा इशारा नामदेव राठोड यांनी दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा