Breaking

बुधवार, ९ जून, २०२१

पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राजकीय संन्यास घेऊन हिमालयात जावे रयत क्रांतीचे प्रा. सुहास पाटील..**जिल्ह्यात येण्यासाठी नैतिकता वाटत नाही स्वतः केले कबूल"



*पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राजकीय संन्यास घेऊन हिमालयात जावे रयत क्रांतीचे प्रा. सुहास पाटील..*


*

जिल्ह्यात येण्यासाठी नैतिकता वाटत नाही स्वतः केले कबूल
"*

टेंभुर्णी-प्रतिनिधी/अमोल भोसले यास कडून

सोलापूर जिल्ह्यातील उजनीतील  पाच टीएमसी पाणी सांडपाण्याच्या  नावाखाली स्वतःच्या इंदापूर तालुक्याला मंजूर करून घेतल्या वरून जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आहे

. म्हणून पालकमंत्र्यांनी राजीनामा देऊन बोलल्याप्रमाणे राजकीय संन्यास घेऊन हिमालयात जावे अथवा राजकीय जीवन प्रवास संपवुन आपल्या अंथुर्णे या स्वगृही परतावे असे आव्हान रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.सुहास पाटील यांनी केले टेंभुर्णी ते पत्रकारांशी बोलताना सांगितले. 
सोलापूर जिल्ह्यातील पाणी वाचवण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या. त्यांनी विविध ठिकाणी आंदोलने उभी केली.काही लोकप्रतिनिधींनी आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रयत्न केला.श्रेय घेण्यासाठी धडपड केली.याचा फायदा सोलापूर जिल्ह्याला होत शासनाला ५ टीएमसी पाण्याचा आदेश रद्द करावा लागला.यावरून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पूर्णतः अपयशी ठरलेले आहेत.

सध्या सोलापूर जिल्ह्यातील विविध सिंचन योजना निधीअभावी प्रलंबित आहेत. असे असताना स्वतःच्या तालुक्याला सांडपाण्याच्या नावाखाली पाच टीएमसी पाणी चोरून नेण्याचा केविलवाणा प्रयत्न पालकमंत्र्यांनी केला.या प्रयत्नाला सोलापूर जिल्ह्यातील रयत क्रांती संघटना, जनहित शेतकरी संघटना,ऊजनी पाणी बचाव संघर्ष समिती,प्रहार शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना,संभाजी ब्रिगेड आदी शेतकरी संघटनांनी रस्त्यावर येऊन तीव्र निदर्शने व आंदोलने उभे केली


.ऊजनी धरणाच्या गेटवर १८ दिवस बेमुदत धरणे आंदोलन केले.या आंदोलनास विविध ग्रामपंचायतींनी पाठिंबा दिला.शेवटी शासनाला माघार घ्यावी लागली व पाच टीएमसी पाण्याचा आदेश रद्द करावा लागला. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लढाई यशस्वी ठरली

.मे महिन्यात राज्य नियोजन मंडळाच्या बैठकीच्या वेळी माजी मंत्री सुभाष बापू देशमुख यांनी उजनीच्या पाणी प्रश्नाबाबत पालकमंत्र्यांना विचारले असता पालकमंत्री म्हणाले, मी उजनीतील एक थेंबही पाणी उचलले असेल तर मी राजकीय संन्यास घेईन.माझेवर चुकीचे आरोप करू नका असे वक्तव्य केले होते.शेवटी पालकमंत्र्यांनी मंजुर केलेले ऊजनीतील पाणी रद्द झाले. त्यामुळे पालकमंत्र्यांनी स्वतः बोलल्याप्रमाणे राजीनामा देऊन राजकीय संन्यास घ्यावा असे प्रा. पाटील आपल्या निवेदनात ही सांगितले आहे.

प्रा सुहास पाटील यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा राजीनामा घ्यावा याविषयीचे निवेदन मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांचेकडे मेलद्वारे पाठविले आहे.प्रा पाटील म्हणाले,सोलापूर जिल्ह्यात कोरोना रोगाने गेल्या तीन महिन्यात १ लाख ५३ हजार रुग्ण बाधित झालेले आहेत.जवळजवळ ४ हजार लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झालेला आहे.लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्ह्याला कोरोना लस मिळवण्यात पालकमंत्री कमी पडले आहेत.

 जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य व्यवस्था मार्च व एप्रिल महिन्यामध्ये संपूर्ण कोलमडलेली होती. सोलापूर जिल्ह्यात रेमडीसीवर इंजेक्शनचा तुटवडा, ऑक्सिजन व  व्हेंटिलेटर बेड रूग्णांना मिळत नव्हते.सोलापूर जिल्ह्यातील लोक कोरोना रोगाने उघड्यावर मृत्युमुखी पडत होते.आरोग्य विभागाची संपूर्ण जबाबदारी, पालकत्व म्हणून पालकमंत्र्यांकडे असताना दत्तात्रय भरणे हे पूर्णपणे अपयशी ठरले.म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व आपला राजकीय जिवनातून संन्यास घेऊन हिमालयात जावे असे आव्हान प्रा.सुहास पाटील यांनी निवेदनाद्वारे केले आहे.



चौकट ********
-ईंदापुर तालुक्यातील एका कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यात जाण्यास नैतिकता वाटत नाही. सोलापूर जिल्ह्यातील जनतेची विश्वासर्हता गमावल्याचे मान्य केले आहे.त्यांनी आपला ईंदापुर तालुका व मुंबई वारीच बरी हे वक्तव्य केले आहे.त्यामुळे पालकमंत्रीपदाचा ताबडतोब राजीनामा देऊन जिल्ह्यातील विकासाचा अडथळा दुर करावा.प्रा सुहास पाटील.जिल्हा संपर्कप्रमुख रयत क्रांती संघटना.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा