ऐक व्यक्ति ऐक झाड अभियानाचा वटपोर्णिमेच्या शुभ मुहर्तावर शुभारंभ....
श्रीगोंदा नगरपरिषदेचा उपक्रम...
श्रीगोंदा-नितीन रोही
वृक्ष तोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला सरकार,सामाजिक संस्था वृक्षारोपण चा आग्रह धरत राहिले पण आपण दुर्लक्ष केले त्याची जबर किंमत आपण मोजली कोरोना महामारीत ऑक्सिजनची किंमत कळली तेंव्हा वृक्षारोपण आणि त्याचे संवर्धनासाठी नागरिकांनी प्राधान्य देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मा .नगराध्यक्ष गटनेते मनोहर पोटे यांनी.माझी वसुंधरा अंतर्गत वृक्षारोपण प्रसंगी बोलताना केले.
शासनाच्या प्रति व्यक्ती १वृक्षारोपण अभियान शुभारंभ येथील प्रभाग ४मधील खुल्या जागेत वड,,चाफ्याचे वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी पोटे बोलत होते .पोटे म्हणाले वटसवित्री पौर्णिमा औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले यापुढे सर्व नागरिकांना वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करण्यासाठी अभियान राबवले जाईल.हा केवळ शासकीय औपचारिक अभियान न राहता आरोग्यासाठी नागरिकांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन पोटे यांनी केले.या वेळी नगराध्यक्षा सौ.शुभांगीताई पोटे,उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे,मुख्याधिकारी मंगेश देवरे,गटनेते मनोहर पोटे,सतिश मखरे,अशोक खेंडके,बापू गोरे,शहाजी खेतमाळीस,सौ.सीमा गोरे,निसार बेपारी,संतोष क्षीरसागर,प्रशांत गोरे,गणेश भोस,अंबादास औटी सह नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.
फोटो,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा