माण -खटाव मध्ये राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्त्यानी जनतेचा आवाज व्हावा - डॉ महेश गुरव
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
राष्ट्रीय काँग्रेस पक्ष म्हणजे फक्त संघटना नसून विचार आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांचा सहभाग असणाऱ्या या पक्षाच्या माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यानी आवाज व्हावा असे प्रतिपादन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ महेश गुरव यांनी केले. या वेळी काँग्रेसचे युवा नेते व प्रदेश काँग्रेस सद्यस्य रणजितसिंह देशमुख, डॉ सुरेश जाधव, अशोकराव गोडसे, डॉ विवेक देशमुख, भरत जाधव व संजीव साळुंखे, शंकरआबा माळी, हणमंत कोळेकर, अॅड संतोष भोसले, अॅड पी डी सावंत, मोहन काळे, डॉ बनसोडे, दाऊदखान मुल्ला, चंद्रकांत काटकर, परेश जाधव, टिल्लू बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने समतेचे विचार दिले आहेत. जनसंघ व शिवसेना,कम्युनिस्ट पक्ष वगळता सर्व राजकीय पक्षाची निर्मिती ही काँग्रेस पक्षाच्या विचारातून झाली आहे. आज काँग्रेस म्हणजे विचारधारा मानणारा पक्ष आहे. परंतु काही स्वार्थी लोकांमुळे आज काँग्रेस पक्ष अडचणीत आला असला तरी पुन्हा फिनिक्स पक्षासारखा हा काँग्रेस पक्ष उभारी घेत आहे. माझ्या सारख्या सुशिक्षित व आक्रमक भूमिका घेणाऱ्या गुरव समाज्याला काँग्रेस पक्षाने अध्यक्ष पदाची संधी उपलब्ध केली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष वाढीसाठी सर्वांच्या सोबत यशस्वीपणे जबाबदारी पार पडणार असे ही डॉ गुरव यांनी सांगितले.
कलेढोणचे युवा नेते संजीव साळुंखे म्हणाले, माण-खटाव मतदारसंघात परिवर्तनाची लाट आली आहे. समविचारी पक्षाने मोट बांधली असून जातीयवादी विचारला मूठमाती देण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे, आता कोणाच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेना छत्रपती शिवराय यांचे स्वप्न साकार करीत आहेत. काँग्रेस प्रवक्ते अॅड भोसले म्हणाले, काँग्रेसचे युवा नेते रणजितसिंह देशमुख व अध्यक्ष डॉ गुरव यांच्या सारख्या आक्रमक नेत्यांमुळे काँग्रेसला माण-खटाव मध्ये गतवैभव प्राप्त होणार आहे. आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या मतदारसंघात लक्ष केंद्रित केल्याने सामान्य कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. भाजप सारख्या भांडवलदार हितधार्जिण व जातीयवादी पक्षाला हद्दपार करण्यासाठी काँग्रेस पक्ष निश्चितच मोठा वाटा उचलेले असे आश्वासन मान्यवरांनी दिले.
कर्मवीर नगर, वडूज येथे झालेल्या फिनिक्स कार्यालयातील बैठकीला पुसेगाव, वडूज गुरसाळे, येरळवाडी, कुरोली, मायणी, कातरखटाव, म्हसवड, डाळमोडी, वरकुटे-मलवडी, दहिवडी, बिदाल, वारुगड मार्डी, आंधळी, गोंदवले, बुध, डिस्कळ, कलेढोण, औंध, पुसेसावळी,अंबवडे, भोसरे, नांदोशी, निमसोड, चितळी, बॉंबाळे, तडवळे, निढळ, भुरकवडी, गोपूज, पळशी, झांशी, वडगाव, वर्धनगड, शिंगणापूर, देवापूर, एनकुळ, शेणवडी, शिरसवडी, गोरेगाव, हिंगणे, सातेवाडी, पेडगाव व माण-खटाव तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय शिंदे यांनी केले व सचिन घाडगे यांनी आभार मानले
--------------------------------------------------- चौकट-१)राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या सारख्या आक्रमक व अभ्यासु नेत्यांचे मार्गदर्शन व माण-खटाव च्या मतदारसंघातील त्रस्त मतदारांची इच्छा यामुळे २०२४ साली या मतदारसंघात महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वांनीच जिद्द ठेवली आहे. असे वातावरण निर्माण झाल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. २)सोमवारी दि १९ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता काँग्रेस पक्षाच्या वतीने वडूज ता खटाव येथे भाजप प्रणित केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ विरोधी सायकल रॅली काढण्यात येणार आहे.यावेळी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे असे आवाहन खटाव काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ विवेक देशमुख यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा