मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा यासाठी संभाजी ब्रिगेडचा लोकप्रतिनिधिना विनंती वजा इशारा
राज्यात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि जातिनिहाय जनगणना व्हावी ही भूमिका कुठलाच पक्ष मांडणी करतांना दिसत नाही. यांना फक्त सत्ता कशी मिळवता येईल एवढंच समजते. या राज्यकर्त्यांनी आत्तापर्यंत मराठा ,ओबीसी समाजाचा फक्त वापरच केला. परंतु आता संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात समोर आली आहे. गेल्या तीस वर्षांपासून मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडने हीच भूमिका प्रामुख्याने राहिली आहे.मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश,ओबीसी आरक्षणाचे संरक्षण, यासाठी ओबीसीसह सर्व जातनिहाय जनगणना याविषयी राज्यातील सर्व मंत्री, आमदार व खासदार यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने शपथपत्र लिहून घेतल्या जात आहे की,मी सन्माननीय लोकसभा किंवा विधानसभा सदस्य वरील विषयी भूमिका येणाऱ्या अधिवेशनामध्ये किंवा विधीमंडळात मांडणार आहे. अशा प्रकारचे शपथपत्र पाठविण्यात येत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधिनी जर या होणाऱ्या अधिवेशनामधे किंवा विधिमंडळात ही भूमिका नाही मांडली तर संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन छेड़ेल. होणाऱ्या परिस्थिस स्वतः लोकप्रतिनिधि जबाबदार असतील असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप बोलताना म्हणाले.
तसे निवेदन सोलापूर जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आ.संजय मामा शिंदे यांच्याकडे देताना संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ, जिल्हा संघटक गणेश सव्वाशे, करमाळा तालुकाध्यक्ष अमित घोगरे,तालुका सचिव गणेश डोके,माढा तालुकाध्यक्ष बालाजी जगताप,ता.उपाध्यक्ष अविनाश पाटील,माळशिरस ता.उपाध्यक्ष सचिन पराडे-पाटील,तालुका संघटक बाळासाहेब वागज,कुर्डू विभागप्रमुख श्रीकांत गायकवाड, शाखाप्रमुख अजित पाटील,अनिकेत पराडे-पाटील ई....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा