Breaking

शुक्रवार, २ जुलै, २०२१

अस्थी व रक्षा विसर्जन जलाशयात न करता राबविला वृक्षारोपणाचा उपक्रमपांरपारिक रुढी, प्रथा व परंपरांना चव्हाण कुटुंबियांनी दिला फाटा



अस्थी व रक्षा विसर्जन जलाशयात न करता राबविला वृक्षारोपणाचा  उपक्रम

अस्थी व रक्षा विसर्जन जलाशयात न करता राबविला वृक्षारोपणाचा उपक्रम

पांरपारिक रुढी, प्रथा व परंपरांना चव्हाण कुटुंबियांनी दिला फाटा पांरपारिक रुढी, प्रथा व परंपरांना चव्हाण कुटुंबियांनी दिला फाटा 
माढा / प्रतिनिधी- आपल्या समाजात मयत व्यक्तीच्या तिसऱ्या दिवशी अस्थी व रक्षाचे विसर्जन जलाशयात करण्याची एक प्रथा वर्षानुवर्षे चालत आली आहे परंतु माढा शहरातील चव्हाण कुटुंबातील सेवानिवृत्त ग्रामसेवक ज्ञानदेव रामचंद्र चव्हाण यांचे 29 जून रोजी निधन झाले होते परंतु त्यांच्या अस्थी व रक्षाचे विसर्जन जलाशयात न करता शेतात वृक्षारोपण करून पारंपरिक रुढी परंपरा व प्रथांना फाटा देत पर्यावरणपूरक उपक्रम राबविला आहे.

वृक्षारोपणाच्या माध्यमातून मयत व्यक्तींच्या स्मृती कायमस्वरूपी जोपासण्यासाठी स्तुत्य उपक्रम राबविला आहे तसेच दहावा व तेराव्याचे विधी टाळून गरजूंना अन्नदान करण्यात येणार आहे. चव्हाण कुटुंबियांनी घेतलेल्या या धाडसी पावलाचे अनेकांनी कौतुक केले आहे.वडिलांचे कर्मकांड व रुढी परंपराविषयी असलेले मत विचारात घेऊन त्यांची मुले सतीश चव्हाण, रविंद चव्हाण,किरण चव्हाण कल्पना लोकरे-चव्हाण व कुटुंबियांनी  वडिलांच्या अस्थी व रक्षा जलाशयात विसर्जित न करता त्याचा वृक्षारोपणासाठी वापर करण्याचा निर्णय घेतला. 1 जुलै या तिसऱ्या दिवशी कुटुंबातील 19 सदस्यांनी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रत्येकी एक रोपटे लावुन ते जोपासण्याचा संकल्प केला.त्यानुसार वड,पिंपळ,गुलमोहर, बहावा,सिताफळ,पेरू,लिंब,पळस, नंदीवृक्ष अशा देशी वृक्षांची लागवड केली.वृक्षारोपणासाठी माढा शहरातील इस्पायर फाऊंडेशनच्या सदस्यांनी सहकार्य केले.

याबाबत मयत ज्ञानदेव चव्हाण यांचे पुत्र किरण चव्हाण म्हणाले,वडिलांचा अंधश्रध्दा व अनावश्यक कर्मकांड यावर विश्वास नव्हता. व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा व्हावी व त्यांच्या पश्चात त्यांचे स्मरण व्हावे हीच खरी श्रध्दांजली असते असे ते नेहमी सांगत असत. त्यांच्या विचारांना मुर्त रुप देण्यासाठी अस्थी व रक्षा जलाशयात विसर्जित न करता वृक्षारोपनासाठी वापरण्याचा निर्णय घेतला तर दहावा, तेरावा, श्राध्द असे विधी टाळत गोरगरीब व गरजूंना अन्नदान करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला आहे.

फोटो ओळी- माढा येथे तिसऱ्या दिवशी अस्थिंचे विसर्जन शेतात करून वृक्षारोपण करताना चव्हाण कुटुंबातील सदस्य.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा