*खुडूस गावातील उड्डाणपुल पिलरवरती होण्यासाठी निवेदन.*
माळशिरस प्रतिनिधी वैष्णवी थोरात
खुडुस गावची लोकसंख्या सध्या 8000 च्या आसपास असुन सध्या खुडूस गावामध्ये गावठाण क्षेत्राचा अभाव असल्याने लोकांना राहण्याकरता व वावरण्याकरता अनेक अडचणींना तोंड द्यावें लागत आहे .
सध्या मौजे खुडूस या गावावरुन आळंदी ते पंढरपुर या पालखी महामार्गाचे काम चालू आहे सदर पालखी महामार्गावर मौजे खुडूस येथे बॉक्स टाईप मध्ये उड्डाणपूलाप्रमाणे मंजूर असल्याबाबतचे समजते तसे झाल्यास खुडुस गावाचे दोन भाग होऊन गावातील लोकांनी दळणवळणाच्या सोयीच्या दृष्टिकोनातून भविष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.मौजे खुडुस या गावी गावठाण शिल्लक नसल्याने मौजे खुडूस या ठिकाणी आठवडा बाजार त्याचबरोबर वाहने पार्किंगची अडचण निर्माण होत असल्याने मौजे खुडूस या गावी सदरचा उड्डाणपूल मौजे मोहोळ जिल्हा सोलापूर येथे असलेल्या उड्डाणपूलप्रमाणे पिलरवरती होणे अत्यंत आवश्यक आहे तसे झाल्यास गावातील लोकांना रहदारीच्या दृष्टिकोनातून अडचण होणार नाही त्याचबरोबर गावामध्ये भरत असलेल्या आठवडे बाजार व पार्किंग याची सोय होणार आहे.अशा परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत खुडूसने याबाबतचा ठराव करून मा. जिल्हाधिकारी मा.उपअधिकारी अकलूज मा.तहसिलदार माळशिरस त्याचबरोबर केंद्रीय व राज्य दळणवळण मंत्री यांना निवेदन तात्काळ पाठवण्यात यावेत.त्यामुळे मौजे खुडूस या गावाला भेडसावणाऱ्या अडचणी दूर होतील हे निवेदन ॲड. शहाजी विठ्ठलराव ठवरे,माजी सरपंच खुडूस ॲड धनाजी हनुमंत ठवरे, माजी ग्रामपंचायत सरपंच खुडूस डॉ तुकाराम बापू ठवरे ,माजी उपसरपंच यांनी हे निवेदन देण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा