Breaking

मंगळवार, ६ जुलै, २०२१



*आई-बहिणींवरुन विधानसभेत शिवीगाळ करणाऱ्या आमदारांचे राजिनामे घेण्याची हिंमत  भाजपने दाखवावी:-नितीनभाऊ झिंजाडे*
*करमाळा   तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील* 
      आई-बहिणींवरुन विधानसभेत शिवीगाळ करणाऱ्या आमदारांचे राजिनामे घेण्याची हिंमत  भाजपने दाखवावी अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीनभाऊ झिंजाडे यांनी केली आहे.
      काल विधान भवनात काही आमदारांनी गदारोळ करत तालिका अध्याक्षांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ करत धक्का बुक्की केली. या मध्ये भाजपचे १२ आमदार शामिल होते.
पार्टी वीथ डिफरन्स असा आव आणणारा पक्ष व त्याच्या नेत्यांचे वेगळेपण काय? हे सबंध महाराष्ट्रातील जनतेने लाईव्ह पाहिले.त्यांच्या नेत्यांनी ते घडल्याचे मान्य केले. विधानसभेत ते खजील झाले.मग राजीनामे का घेत नाही?
विधान भवनात काम काज सुरू असताना जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणे वेगळे आणी जनतेच्या प्रश्नांच्या नावाखाली आई बहिणीं वरून शिवीगाळ करत जनतेच्या नावाने जनतेची बदनामी करणे ही महाराष्ट्राची संस्कृती तर नाही.महाराष्ट्राच्या संसदीय परंपरेला भाजप ने काळीमा फासली आहे.सभ्य, सुसंस्कृत व वैचारीक पक्ष असल्याचा आव आणणाऱ्या भाजप पक्षातील आमदारांना हे असले कृत्य करणे शोभत नाही.ह्या असल्या गुंड प्रवृत्तीच्या आमदारांना सुसंस्कृतीचे ढोंग करणारा भाजप पक्ष आता कारवाई करायचे सोडुन त्यांना पाठीशी घालत आहे. खरच जर भाजप पक्षाला जनतेचे  प्रश्न  व महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मान राखायचा असेल तर या अश्या आमदारांना पक्षातुन निलंबीत करून त्यांचे रीजीनामे घेतले पाहीजे.
या आमदारांनी राज्यातील आया-बहीणींची माफी मागुन आपापल्या आमदार पदाचा राजीनामा द्यावा.व भाजपने त्यांचा राजीनामा घेण्याचे धाडस दाखवावे.अशी मागणी त्यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा