Breaking

शुक्रवार, ३० जुलै, २०२१

तुळजापूर शहरात एका मातंग समाजातील २५ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने खून केल्याप्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावे, या मागणीसाठी भीम अण्णा संघटनेच्या वतीने तुळजापूर पोलीस स्टेशन वर प्रेत नेऊन मोर्चा काढण्यात आला*

*तुळजापूर शहरात एका मातंग समाजातील २५ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने खून केल्याप्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावे, या मागणीसाठी भीम अण्णा संघटनेच्या वतीने तुळजापूर पोलीस स्टेशन वर प्रेत नेऊन मोर्चा काढण्यात आला*


तुळजापूर शहरातील शासकीय गोदामा जवळ, दि,२९ जुलै २०२१,रोजी, मातंग समाजातील काक्रंबा येथील २५ वर्षीय युवक शंकर दाजीबा गायकवाड याचा धारदार शस्त्राने खून करून आरोपी फरार झाला आहे, खून केलेल्या आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावे, या मागणीसाठी भिम अण्णा संघटनेच्या वतीने, प्रेत घेऊन तुळजापूर पोलीस स्टेशन वर मोर्चा काढण्यात आला,यावर पोलीस प्रशासनाने आरोपीला अटक करू असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच तुळजापूर शहरातील खून प्रकरणी व येवती येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील दोन्ही प्रकरणातील आरोपीना अटक नाही झाली तर येत्या  २ ऑगस्टला  भिम अण्णा संघटनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशाराही देण्यात आला आहे,या मोर्चामध्ये मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा