*सरपंच परिषदेला सहकार्य करण्याचे आश्वासन,सरपंच परिषदेच्या टीमनी साधला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संवाद*
तुळजापूर - राज्याचे माजी मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांची महाराष्ट्र सरपंच परिषद पुणे टीमच्या सदस्यांनी भेट घेऊन अनेक विषयावर चर्चा करत संवाद साधला.यावेळी गावस्तरांवरील विविध समस्या व मागण्याबाबत सकारात्मक विचार करून सरकारला याबाबत अवगत करू असे आश्वासन यावेळी दिले.
महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद पुणे यांच्या माध्यमातून राज्यात खूप चांगले काम सुरू असून सरपंच यांना तालुका व जिल्हा स्तरावरील येणाऱ्या समस्या व अडीअडचणी लक्षात घेता यावर नक्कीच राज्य सरकारशी सकारात्मक संवाद करू आणि सरपंच मानधनवाढ बाबत विधानसभेत प्रश्न मांडू असे आश्वासन यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.
यावेळी यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले,प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ,मार्गदर्शक शंकरराव खापे, राज्य कार्यकारणी सदस्य कोहिनूर सय्यद, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुजित हंगरेकर, के पी पाटील जालना यांची उपस्थिती होती.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा