Breaking

बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

विठ्ठलसाई कारखान्याकडून कृषी सहाय्यक कंधारे यांना 19 लाख सात हजार रुपयाची कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला**कै बाबाराव कदारे कृषी सहाय्यक यांचा करोना मुळे झाला होता मृत्यू*


*विठ्ठलसाई कारखान्याकडून कृषी सहाय्यक कंधारे यांना 19 लाख सात हजार रुपयाची कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला*
*कै बाबाराव कदारे कृषी सहाय्यक यांचा कोरोना मुळे झाला होता मृत्यू*

तालुक्यातील मुरुम येथील श्री . विठ्ठलसाई कारखान्यातील कै. . बाबाराव कदारे कृषि सहाय्यक यांचा कोरोना प्रादुभावामुळे निधन झाले . कारखान्याने अशा कर्मचाऱ्यांच्या कुंटूबीयांबद्दल पुर्वी पासूनच सहानुभूतीचे धोरण ठेवून वेळोवळी सढळ हाताने आर्थिक मदत केलेली आहे . याचाच भाग म्हणून कारखान्याचे चेअरमन माजी मंञी बसवराज पाटील यांनी कदारे यांच्या कुंटूबास आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते . त्यानुसार उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते तथा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक  शरण पाटील कारखान्याचे यांच्या हस्ते कदारे यांना मिळणारी रक्कम व कारखान्याकडून आर्थिक मदत मिळून असे एकूण रु . १ ९ .०७ ( एकोणीस लाख ७ हजार ) धनादेश त्यांच्या पत्नी श्रीमती . शिलादेवी बाबाराव कदारे यांना आज अचलेर येथे त्यांच्या घरी नेवून देण्यात आले . तसेच भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून के . कदारे यांच्या पत्नीला दरमहा रु . २६४६ फॅमिली पेन्शन व त्यांच्या दोन मुलांना प्रत्येकी दरमहा रु . ६६२.०० प्रमाणे पेन्शन मंजूर करुन घेण्यात आले आहे . या प्रसंगी मा . श्री . दत्ता पाटील संचालक डी . सी . सी . बँक उस्मानाबाद , श्री . प्रकाश लोखंडे सरपंच , श्री . सुभाष सोलंकर माजी सरपंच , परमेश्वर पटणे , शिवराज कमलापुरे , शिवपुत्र पाटील , सिध्दाराम पत्रिके , महादेव कदारे , आप्पासाहेब कदारे , अचितानंद कुंभार , कल्लाप्पा गोपने , कारखान्याचे कार्यकारी संचालक एम . बी . अथणी , चिफ अंकाऊटंट शत्रुघ्न देशमुख , केन अंकाऊटंट राजु पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते .
**********************************************
*महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त 41 साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्हा ओळखला जातो या जिल्ह्यात किमान 26 ते 27 कारखाने चालले असून या कारखान्यांमध्ये अनेक कामगार काम करत असताना. कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्या मध्ये आनेक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला . त्या कुटू्बांना सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार मदत करणार का ? असा प्रश्न कोरोनाग्रस्त कुटुंबांना पडला आहे*




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा